राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोयं. यामुळे राज्यातील जवळपास सर्वच धरणे फुल्ल झाली आहेत. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने अनेक नद्यांचे पाणी लोकांच्या घरामध्ये आणि शेतामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. भंडाऱ्यातील वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलायं. कारण वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढताना दिसते आहे. यामुळे नागरिकांना सर्तकेचा इशारा देत नदी पात्रामध्ये उतरू नका असे सांगण्यात आले आहे.