अतिवृष्टीमुळे राज्यातील एनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक नागरिकांचे मोठे नुकसान यावेळी झाले. पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत या मदतीबाबत सविस्तर माहिती दिली.