मंत्री छगन भुजबळ म्हणाले, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांची नोंद घेण्याची गरज नाही. आपल्या देशात कित्येकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. नेहरुंचे ही योगदान आहे. कंगना आणि गोखलेंच्या वक्तव्यावर समाज माध्यमातून देखील टीका झाली. इतिहास बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये, अशा इशारा यावेळी भुजबळांनी दिला. ते मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त बोलत होते.