“मैं चोर नहीं हूँ”, त्या ट्रक चालकाच्या आत्महत्येला कोण जबाबदार?

"मैं चोर नहीं हूँ" असं लिहून त्या ट्रक चालकाने आत्महत्या (Nagpur Truck Driver) केली होती. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशनसमोर ट्रकच्या कॅबिनला तार बांधून गळफास घेणाऱ्या ट्रक ड्रायव्हरच्या हात आणि पायावर "मैं चोर नहीं हूँ" असे लिहिलेलं आढळले आहे.

मैं चोर नहीं हूँ, त्या ट्रक चालकाच्या आत्महत्येला कोण जबाबदार?
Nagpur Truck Driver Suicide
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 9:21 AM

नागपूर : “मैं चोर नहीं हूँ” असं लिहून त्या ट्रक चालकाने आत्महत्या (Nagpur Truck Driver) केली होती. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशनसमोर ट्रकच्या कॅबिनला तार बांधून गळफास घेणाऱ्या ट्रक ड्रायव्हरच्या हात आणि पायावर “मैं चोर नहीं हूँ” असे लिहिलेलं आढळले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण आलंय (Nagpur Truck Driver Allegedly Hanged Himself To Vehicle Found Mai Chor Nahi hu Message On His Hand And Leg In Postmortem).

अशोक जीतूलाल नागोत्रा (वय 40) नावाच्या ट्रक चालकाने मंगळवारी (15 जून) सकाळी नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशन समोरच ट्रकला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या शवविच्छेदनादरम्यान ही बाब समोर आलीये.

अशोक नागोत्रांविरोधात ट्रक मालकाची पाच दिवसांनी पोलिसात तक्रार

तेल चोरी आरोपाखाली 14 जूनच्या रात्री कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालक अशोक नागोत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत अशोक नागोत्रा सापडले नव्हते.

9 जूनच्या रात्री अशोक नागोत्रा यांच्या ट्रकमधून नागपूर जिल्ह्यातील सातनवरी शिवारातील बाजारगाव येथील पेट्रोल पंप जवळून तेलाचे पिंप चोरीला गेले होते. ट्रान्सपोर्ट मालकाने यासंदर्भात चोरीच्या घटनेच्या पाच दिवसानंतर म्हणजे 14 जूनला संध्याकाळी कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अशोक नागोत्रा यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करत ट्रक पोलीस स्टेशनच्या समोर उभा केला.

ट्रकला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह

मंगळवारी सकाळी अशोक नागोत्रा पोलीस स्टेशन समोर ट्रकला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. शवविच्छेदन करताना त्यांच्या हातावर आणि पायावर मी चोर नाही, असं लिहिलेलं आढळून आले आहे, त्यामुळे या आत्महत्या प्रकरणात नवे वळण आले आहे

अशोक नागोत्रा यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार कोण?

ट्रकमधून तेलाचे पिंप चोरी गेल्याच्या पाच दिवसांनंतर ट्रान्सपोर्ट मालकाने या घटनेची तक्रार पोलिसांत नोंदवली. या प्रकरणात पोलिसांनी अशोक नागोत्रा यांच्यावर अवास्तव दबाव आणला होता का, त्यांना कोणी मारहाण केली होती का, किंवा प्रामाणिक असूनही ट्रक मालक आणि पोलिसांनी त्यांच्यावर चोरीचा आरोप ठेवल्यामुळे नैराश्यात त्यांनी आत्महत्या केली आहे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत?

Nagpur Truck Driver Allegedly Hanged Himself To Vehicle Found Mai Chor Nahi hu Message On His Hand And Leg In Postmortem

संबंधित बातम्या :

डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक

लग्नाच्या आमिषाने मित्राच्या बहिणीवर सहा वर्ष बलात्कार, कॉन्स्टेबलला अटक

तरुणाचा यूट्युब पाहून बॉम्ब बनवण्याचा प्रयोग फसला, डिफ्युज करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.