AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटावरून वादादरम्यान अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य

"आताही उपस्थित केले जातात प्रश्न"; अमिताभ बच्चन यांचं वक्तव्य चर्चेत

शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटावरून वादादरम्यान अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य
Amitabh BachchanImage Credit source: Twitter
| Updated on: Dec 16, 2022 | 8:58 AM
Share

कोलकाता: कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधल्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्कार केला. चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल ममता यांनी बिग बींचे आभार मानले. तर यावेळी भाषणादरम्यान बिग बींनी काही मोठे मुद्दे मांडले. त्यांच्या भाषणातील मुद्दे सध्या चर्चेत आले आहेत. सिनेमाचा विकास आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबद्दल ते व्यक्त झाले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर उपस्थित केले प्रश्न

अमिताभ बच्चन यांनी फेस्टिव्हलमध्ये ब्रिटिश सेन्सॉरशिप, छळ करणाऱ्यांविरोधात स्वातंत्र्यापूर्वीचे चित्रपट, सांप्रदायिकता आणि सामाजिक एकता यांच्यावर सविस्तर चर्चा करण्याची गरज असल्याचं म्हटलं. “मला विश्वास आहे की मंचावर बसलेले माझे सहकारी याच्याशी सहमत असतील की आतासुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत”, असं ते म्हणाले.

“चित्रपटाच्या कंटेटमध्ये आता बरेच बदल पहायला मिळतात. आता विविध विषयांना हात लावला जातो. पौराणिक चित्रपटांपासून ते आर्ट हाऊस, अँग्री यंगमॅन आणि काल्पनिक अंधराष्ट्रवाद यांसारखे अनेक विषय आहेत. या विषयांवर सिंगल स्क्रीन आणि ओटीटीच्या माध्यमातून विचार मांडले जातात”, असंही मत बिग बींनी मांडलं.

प्रेक्षकांविषयी ते पुढे म्हणाले, “आपण प्रेक्षकांना कमी लेखू शकत नाही. त्यांच्याकडे प्रत्येक प्रकारचा कंटेट असतो. त्यांना तो कंटेट पाहायची इच्छा असते आणि ती त्यांची मर्जी आहे.”

विशेष म्हणजे सध्या शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा वाद सुरू असताना बिग बींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल केलेलं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत शाहरुख खानसुद्धा उपस्थित होता.

काय म्हणाला शाहरुख?

“हे जग आता नॉर्मल झालंय. सर्वजण खुश आहेत. मी सर्वाधिक खुश आहे आणि हे सांगण्यात मला कोणतीही समस्या नाही की जगाने काहीही केलं तरी, मी, तुम्ही लोकं आणि जगात जितकेही सकारात्मक लोक आहेत, ते जिवंत आहेत”, असं तो या कार्यक्रमात म्हणाला.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?