AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्याने मला माणसाचा जन्म दिला…’ नाना पाटेकर कधीच देवळात का जात नाहीत? आहे मोठं कारण

अभिनेते नाना पाटेकर हे नेहमी त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. पण त्यांचं एक वाक्य जे फार चर्चेचा विषय आहे. ते म्हणजे ते देवळात जात नाही याचं कारण. त्यांनी याचं कारण बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. नाना पाटेकर कधीही मंदिरात आवर्जून जात नाहीत यामागे मोठं कारण आहे.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jul 03, 2025 | 1:15 PM
Share
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर ज्यांनी हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमावलं आहे. तसेच त्यांच्या अभिनयानेच नाही तर त्यांच्या हटके शैलीमुळे देखील ते लोकांच्या पसंतीस उतरतात. त्यांची हटके स्टाईल आणि स्पष्ट बोलणारा स्वभाव लोकांना भावतो. गंभीर अभिनयापासून ते कॉमेडीपर्यंत सर्व प्रकराच्या भूमिका त्यांनी केल्या आहेत.

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर ज्यांनी हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमावलं आहे. तसेच त्यांच्या अभिनयानेच नाही तर त्यांच्या हटके शैलीमुळे देखील ते लोकांच्या पसंतीस उतरतात. त्यांची हटके स्टाईल आणि स्पष्ट बोलणारा स्वभाव लोकांना भावतो. गंभीर अभिनयापासून ते कॉमेडीपर्यंत सर्व प्रकराच्या भूमिका त्यांनी केल्या आहेत.

1 / 5
नाना पाटेकर यांनी 'अग्निसाक्षी' आणि 'क्रांतीवीर' सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यांना त्यांच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. सोबतच मराठी सिनेसृष्टीतील त्यांच काम त्या तोडीच आहे. एवढं नाही तर नाना नाम फाउंडेशनशी जोडलेले आहेत.

नाना पाटेकर यांनी 'अग्निसाक्षी' आणि 'क्रांतीवीर' सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यांना त्यांच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. सोबतच मराठी सिनेसृष्टीतील त्यांच काम त्या तोडीच आहे. एवढं नाही तर नाना नाम फाउंडेशनशी जोडलेले आहेत.

2 / 5
नानांबद्दल तसं सर्वांना माहित आहे. त्यांचा स्पष्ट स्वभावही सर्वांना माहित आहे. त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या व्यैयक्तिक आयुष्याबद्दल देखील नेहमीच स्पष्टपणे बोलले आहेत.  त्यांचं एक वक्तव्य चर्चेत आहे  ते नेहमी म्हणतात की, आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं. नानांबद्दल अजून एक जी की फार कोणाला माहित नसेल ते म्हणजे, नाना कधीच देवळात जात नाहीत. होय नाना कधीच देवळात जात नाही. असं का? याबद्दल नानांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितलंय.

नानांबद्दल तसं सर्वांना माहित आहे. त्यांचा स्पष्ट स्वभावही सर्वांना माहित आहे. त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या व्यैयक्तिक आयुष्याबद्दल देखील नेहमीच स्पष्टपणे बोलले आहेत. त्यांचं एक वक्तव्य चर्चेत आहे ते नेहमी म्हणतात की, आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं. नानांबद्दल अजून एक जी की फार कोणाला माहित नसेल ते म्हणजे, नाना कधीच देवळात जात नाहीत. होय नाना कधीच देवळात जात नाही. असं का? याबद्दल नानांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितलंय.

3 / 5
नुकत्याच एका कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी देवळात न जाण्याचं कारण सांगितलं.  ते म्हणाले, "मी जाणीवपूर्वक देवळात जात नाही, पण याचा अर्थ मी देवाला मानत नाही असा नाही. त्याने मला माणसाचा जन्म दिलाय हेच खूप आहे, वारंवार तिथे जाऊन त्याला कशाला त्रास द्यायचा? आठ आणे टाकून लाख रुपये दे असं म्हणायचं... नाही, कशाला पाहिजे! माणूस म्हणून जन्माला घातलं तो जन्म पूर्ण सार्थकी लागेल असं जगायचं आणि एक दिवस मरून जायचं. कोण अमरपट्टा घेऊन आलं आहे का?" असं म्हणत त्यांनी त्यांचे मत व्यक्त केलं आहे.

नुकत्याच एका कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी देवळात न जाण्याचं कारण सांगितलं. ते म्हणाले, "मी जाणीवपूर्वक देवळात जात नाही, पण याचा अर्थ मी देवाला मानत नाही असा नाही. त्याने मला माणसाचा जन्म दिलाय हेच खूप आहे, वारंवार तिथे जाऊन त्याला कशाला त्रास द्यायचा? आठ आणे टाकून लाख रुपये दे असं म्हणायचं... नाही, कशाला पाहिजे! माणूस म्हणून जन्माला घातलं तो जन्म पूर्ण सार्थकी लागेल असं जगायचं आणि एक दिवस मरून जायचं. कोण अमरपट्टा घेऊन आलं आहे का?" असं म्हणत त्यांनी त्यांचे मत व्यक्त केलं आहे.

4 / 5
 नाना पाटेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ते 'हाऊसफुल 5' मध्ये दिसले.  चित्रपटातील त्यांच्या कामाचं खूप कौतुकही झालं. यापूर्वी ते 'वनवास' सिनेमात उत्कर्ष शर्मासोबत दिसले होते, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आगामी 'SSMB29' सिनेमात नाना पाटेकर दिसणार असल्याची चर्चा होती, पण त्यांनी या सिनेमातून माघार घेतल्याचं बोललं जात आहे.

नाना पाटेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ते 'हाऊसफुल 5' मध्ये दिसले. चित्रपटातील त्यांच्या कामाचं खूप कौतुकही झालं. यापूर्वी ते 'वनवास' सिनेमात उत्कर्ष शर्मासोबत दिसले होते, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आगामी 'SSMB29' सिनेमात नाना पाटेकर दिसणार असल्याची चर्चा होती, पण त्यांनी या सिनेमातून माघार घेतल्याचं बोललं जात आहे.

5 / 5
Follow Us
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा