AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shakti Kapoor | मी आजसुद्धा तिच्यासमोर हात जोडतो; पत्नीविषयी असं का म्हणाले शक्ती कपूर?

71 वर्षीय शक्ती कपूर यांचं खरं नाव सुनील कपूर असं होतं. मात्र फिल्म इंडस्ट्रीत हे नाव योग्य वाटणार नाही म्हणून त्यांनी सुनील नाव बदलून शक्ती असं ठेवलं. हळूहळू शक्ती कपूर यांनी बॉलिवूडमध्ये खलनायक भूमिकांसाठी आपली ओळख निर्माण केली.

| Updated on: Oct 09, 2023 | 3:01 PM
Share
अभिनेते शक्ती कपूर यांचा जन्म 3 सप्टेंबर 1952 रोजी दिल्लीमध्ये झाला. अभिनेते सुनील दत्त यांची नजर जेव्हा शक्ती कपूर यांच्यावर पडली तेव्हा त्यांनी 'रॉकी' या चित्रपटासाठी त्यांना कास्ट केलं. 'रॉकी' आणि 'कुर्बानी' या चित्रपटांमुळे त्यांना चांगलीच ओळख मिळाली.

अभिनेते शक्ती कपूर यांचा जन्म 3 सप्टेंबर 1952 रोजी दिल्लीमध्ये झाला. अभिनेते सुनील दत्त यांची नजर जेव्हा शक्ती कपूर यांच्यावर पडली तेव्हा त्यांनी 'रॉकी' या चित्रपटासाठी त्यांना कास्ट केलं. 'रॉकी' आणि 'कुर्बानी' या चित्रपटांमुळे त्यांना चांगलीच ओळख मिळाली.

1 / 5
शक्ती कपूर यांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण शिवांगी कोल्हापुरेशी लग्न केलं. शिवांगी त्यांच्यापेक्षा बारा वर्षांनी लहान आहेत. शिवांगी त्यांची चाहती म्हणून पहिल्यांदा शक्ती कपूर यांना भेटली होती. मात्र हळूहळू त्या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

शक्ती कपूर यांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण शिवांगी कोल्हापुरेशी लग्न केलं. शिवांगी त्यांच्यापेक्षा बारा वर्षांनी लहान आहेत. शिवांगी त्यांची चाहती म्हणून पहिल्यांदा शक्ती कपूर यांना भेटली होती. मात्र हळूहळू त्या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

2 / 5
एका पॉडकास्टमध्ये शक्ती कपूर यांनी सांगितलं होतं, "शिवांगी दिसायला खूपच सुंदर होती आणि त्याकाळी तिला बऱ्याच चित्रपटांचे ऑफरसुद्धा मिळत होते. तिने सावन कुमार टांक यांचा 'लैला' हा चित्रपट साइन केला होता. मात्र हा चित्रपट साइन केल्यानंतर मी तिच्याकडे विनंती केली की तू कृपया चित्रपट करू नको. तू गृहिणी बनून राहा."

एका पॉडकास्टमध्ये शक्ती कपूर यांनी सांगितलं होतं, "शिवांगी दिसायला खूपच सुंदर होती आणि त्याकाळी तिला बऱ्याच चित्रपटांचे ऑफरसुद्धा मिळत होते. तिने सावन कुमार टांक यांचा 'लैला' हा चित्रपट साइन केला होता. मात्र हा चित्रपट साइन केल्यानंतर मी तिच्याकडे विनंती केली की तू कृपया चित्रपट करू नको. तू गृहिणी बनून राहा."

3 / 5
शक्ती कपूर यांनी पुढे सांगितलं, "मी शिवांगीला म्हटलं की मला तुला गृहिणी म्हणून पहायचंय. आज 40 वर्षे झाली आणि तिने माझ्यासाठी स्वतःचं करिअर सोडलं. मी माझ्या करिअरच्या शिखरावर असताना शुभांगीशी लग्न केलं होतं आणि त्यानंतर माझं आयुष्य आणखी उत्तम झालं. त्यासाठी मी आजही तिच्यासमोर हात जोडतो."

शक्ती कपूर यांनी पुढे सांगितलं, "मी शिवांगीला म्हटलं की मला तुला गृहिणी म्हणून पहायचंय. आज 40 वर्षे झाली आणि तिने माझ्यासाठी स्वतःचं करिअर सोडलं. मी माझ्या करिअरच्या शिखरावर असताना शुभांगीशी लग्न केलं होतं आणि त्यानंतर माझं आयुष्य आणखी उत्तम झालं. त्यासाठी मी आजही तिच्यासमोर हात जोडतो."

4 / 5
शिवांगी आणि शक्ती कपूर यांची श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर ही दोन मुलं आहेत. या दोघांनीही फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली आहे. शक्ती कपूर हे पत्नी शिवांगीला आपला लकी चार्म मानतात.

शिवांगी आणि शक्ती कपूर यांची श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर ही दोन मुलं आहेत. या दोघांनीही फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली आहे. शक्ती कपूर हे पत्नी शिवांगीला आपला लकी चार्म मानतात.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.