AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलाच्या ‘अपमानाचा’ बदला घेणार, माजी केंद्रीय मंत्री निवडणूक लढवणार की इंडिया आघाडीत सामील होणार?

मुलाच्या अपमानास्पद जाण्याने ते खूप दुखावले आहेत. तसेच, जुन्या लोकसभा मतदारसंघात भाजपची वाटचाल कठीण करण्यासाठी ते येत्या काही दिवसांत ते मोठा निर्णय घेऊ शकतात. त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून ते हजारीबागेत बसून भविष्याची रणनीती आखत आहेत.

मुलाच्या 'अपमानाचा' बदला घेणार, माजी केंद्रीय मंत्री निवडणूक लढवणार की इंडिया आघाडीत सामील होणार?
PM NARENDRA MODIImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Mar 06, 2024 | 7:13 PM
Share

हजारीबाग | 6 मार्च 2024 : भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, ही यादी जाहीर करण्याच्या काही तास आधी जयंत सिन्हा यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. लोकसभेचे तिकीट मिळणार नाही याची त्यांना पूर्वकल्पना असल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला होता अशी चर्चा सुरु होती. जयंत सिन्हा यांच्या हजारीबाग या मतदारसंघातून भाजपने आमदार मनीष जैस्वाल यांना उमेदवारी दिली. मात्र, पक्ष नेतृत्वाच्या या निर्णयामुळे माजी केंद्रीय मंत्री भलतेच संतापले आहेत. मुलाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी आता हालचाली सुरु केल्या आहेत.

मुलगा जयंत सिन्हा यांच्या अपमानामुळे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा दुखावले आहेत. हजारीबाग हा यशवंत सिन्हा यांचा पारंपारिक मतदार संघ आहे. ह्जारीबागमधील कोणत्याही निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा विरोध किंवा पाठिंबा हा महत्त्वाचा मानला जातो. असे असतानाही भाजप नेतृत्वाने जयंत सिन्हा याची तिकीट कापले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

जयंत सिन्हा यांचे तिकीट रद्द झाल्यानंतर दिल्लीत रहाणारे यशवंत सिन्हा यांनी आपला मुक्काम हजारीबागला हलविला आहे. यशवंत सिन्हा हजारीबागला परत येताच त्यांच्या अनेक समर्थकांनी त्यांची निवासस्थानी भेट घेतली. सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्यांनी पुन्हा एकदा हजारीबाग मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली.

समर्थकांनी मागणी केली असली तरी प्रकृतीचा विचार करता यशवंत सिन्हा निवडणूक लढवण्यास मानसिकदृष्ट्या तयार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिलीय. मुलाने सक्रिय राजकारणाला ज्या प्रकारे निरोप दिला आणि भाजपने जयंत सिन्हा यांना ज्या पद्धतीने डावलले त्याचे परिणाम येत्या काळात दिसून येतील. त्यामुळे स्वत: यशवंत सिन्हा कुटुंबाचे राजकीय मैदान वाचवण्यासाठी मैदानात उतरू शकतात. त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून ते हजारीबागेत बसून भविष्याची रणनीती आखत आहेत असेही या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस आमदार अंबा प्रसाद यांनी यशवंत सिन्हा यांची त्यांच्या हजारीबाग येथील निवासस्थानी भेट घेतली. आंबा प्रसाद यांनी सोशल मीडियावर यशवंत सिन्हा यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची भेट घेतली. भारतीय आघाडीचे धोरण, तत्त्वे, आगामी लोकसभा निवडणुका आणि इतर राजकीय मुद्द्यांवर त्यांच्यासोबत चर्चा केली.’ अशी पोस्ट त्यांनी सोशल मिडीयावर केलीय.

यशवंत सिन्हा आणि अंबा प्रसाद यांची ही भेट राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यामधून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. आमदार अंबा प्रसाद यांनी यशवंत सिन्हा यांना स्वबळावर निवडणूक लढविण्यास सांगितले. तर दुसरी अशीही चर्चा आहे की अंबा प्रसाद यांनी यशवंत सिन्हा यांना ‘भारत’ आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे.

हजारीबागमध्ये मात्र यशवंत सिन्हा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भारत आघाडीच्या नेत्यांसोबतच यशवंत सिन्हा यांनी निवडणूक लढविण्यासाठी जनतेचा मोठा दबाव आहे. मुलाच्या अपमानास्पद जाण्याने ते खूप दुखावले आहेत. तसेच, जुन्या लोकसभा मतदारसंघात भाजपची वाटचाल कठीण करण्यासाठी ते येत्या काही दिवसांत ते मोठा निर्णय घेऊ शकतात अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल