AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्ही तिघांनी लक्ष घातलंय त्यामुळं आता…’, सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात अजितदादांचा थेट इशारा

काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. यावर बोलताना अजित पवार यांनी आता थेट इशारा दिला आहे.

'आम्ही तिघांनी लक्ष घातलंय त्यामुळं आता...', सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात अजितदादांचा थेट इशारा
| Updated on: Dec 22, 2024 | 7:45 PM
Share

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली. वातावरण चांगलंच तापलं. दरम्यान शनिवारी अजित पवार यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी या प्रकरणातील मास्टरमांइट कोणीही असेल तो सुटणार नाही असं म्हटलं होतं. दरम्यान पुन्हा एकदा बारामतीमध्ये बोलताना त्यांनी इशारा दिला आहे. सलग सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल बारामती राष्ट्रवादी काँग्रेस तालुका व शहरच्या वतीने शारदा प्रांगण येथे अजित पवार यांच्या  जाहीर नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

बीडमध्ये सरपंचाची माणुसकीला काळिमा फासेल अशी घटना घडली, त्या घटनेचा मास्टरमाइंड कुणी असला तरी त्याची कितीही पोहच असली तरी त्याला सोडणार नाही. बीडच्या घटनेत आम्ही तिघांनी लक्ष घातलं आहे. अमानुष लोकांना फास्ट ट्रॅक केस चालून फाशीची शिक्षा होईल, अशी सजा त्यांना मिळेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, परभणीमध्ये घडलेल्या घटनेत देखील आम्ही लक्ष घातलं आहे. पोलीस यंत्रणेला देखील आदेश दिले आहेत, या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.  बारामतीत देखील अनेक घटना घडत असतात, त्यामुळे आई वडिलांनी मुलांकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

विरोधकांना टोला 

दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधकांना टोला लागावला. विरोधकांकडून विधानसभा निकालानंतर सातत्यानं ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे, यावर बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की,  जनता एकतर्फी कौल देईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. आम्ही कधीही इव्हीएमला दोष दिला नाही. लोकसभानंतर महायुती अधिक जोमाने कामाला लागली, लोकसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना आणि शेतकरी वर्गासाठी केलेल्या वीज माफीमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.