AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेमरी लॉस्ट झालीय… राहुल गांधी असं का म्हणाले?; अमरावतीतील सभेतून हल्ला काय?

Rahul Gandhi on PM Narendra Modi : अमरावतीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होत आहे. या सभेतून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. यंदाची ही विचारधारेची लढाई आहे, असंही राहुल गांधी म्हणालेत. वाचा सविस्तर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेमरी लॉस्ट झालीय... राहुल गांधी असं का म्हणाले?; अमरावतीतील सभेतून हल्ला काय?
नरेंद्र मोदी, राहुल गांधीImage Credit source: Facebook
| Updated on: Nov 16, 2024 | 1:22 PM
Share

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होतेय. प्रचाराचे अवघे दोन दिवस राहिलेत. अमरावतीत आज महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेला काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेमरी लॉस्ट झालीय, असं राहुल गांधी म्हणाले. देशात विचारधारेची लढाई आहे. भाजप आणि पंतप्रधान हे बंद खोलीत बसून संविधानाची हत्या करत आहेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसंच भाजपवर बोलताना राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचा उल्लेख केला.

नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा

नरेंद्र मोदी म्हणतात राहुल गांधी हे आरक्षण विरोधात आहे. माझ्या बहिणीने भाषण ऐकलं. ती म्हणाले, जे आम्ही बोलतो तेच मोदी आजकाल बोलत आहेत. कदाचित स्मृतीभ्रंश झाला असावा. अमेरिकेचा एक माजी राष्ट्रपती होता. तो कधी काय बोलायचा आणि कधी काय बोलायचा. त्यावेळी त्यांना सांगावं लागायचं असं नाही असं बोला. एकदा युक्रेनच्या राष्ट्रपतीला अमेरिकाचा माजी राष्ट्रपती रशियाचा राष्ट्रपती म्हणून बोलू लागला. तसंच आपल्या पंतप्रधानांची मेमरी लॉस होत आहे. पुढच्या मिटिंगमध्ये म्हणतील महाराष्ट्रातील सरकार प्रती क्विंटल सात रुपये सोयाबीन देत आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी आहे तर दुसरीकडे भाजप, संघ आहे. देश संविधानाने चालला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पण पंतप्रधान म्हणतात हे रिकामं पुस्तक आहे. यात काही लिहिलं नाही. हे पुस्तक केवळ संघाच्या कार्यकर्त्यांसाठी रिकामं आहे. भाजपसाठी आहे. आमच्यासाठी संविधान हे देशाचा डीएनए आहे. यात आंबेडकर, फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, बुद्ध, नारायण गुरू, बसवण्णा, महात्मा गांधी यांचे विचार आहेत. हे आमच्यासाठी नवं पुस्तक नाही. तर हा हजारो वर्षांपासूनच्या विचारधारेचा दस्ताऐवज आहे. त्यासाठी लोक लढत आहेत, मरत आहेत, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

अदानींचं नाव घेत हल्लाबोल

भाजप आणि पंतप्रधान हे बंद खोलीत बसून संविधानाची हत्या करत आहेत. जेव्हा महाराष्ट्रातील जनतेची सरकार चोरी केली गेली. त्या मिटिंगमध्ये अदानी, अमित शाह बसले. सरकार चोरी करण्याची मिटिंग होती. त्यात निर्णय घेण्यात आला, की आमदारांना विकत घ्यायचे. कोट्यवधीत खरेदी करायचं. जेव्हा अमित शाह आणि भाजपच्या लोकांनी मिटिंग केली. तुमचं सरकार खरेदी करून विकत घेतलं, ही काय संविधानाची सुरक्षा आहे. सरकार चोरलं पाहिज हे काय संविधानात लिहिलं काय. हे सरकार धारावीसाठी चोरण्यात आलं होतं. भाजपचे लोक, मोदी, शाह धारावीची जमीन महाराष्ट्रातील गरीबांची जमीन एक लाख कोटीची जमीन आपले मित्र गौतम अदानीला द्यायची होती. त्यामुळे महाराष्ट्राची सरकार तुमच्या हातून चोरलं. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केल आहे.

Follow Us
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.