AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे सरकार संविधान आणि न्यायालयाला मानत नाही; मोदींचा हल्लाबोल

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : राज्यात सध्या निवडणुकीचं वार आहे. राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीची तयारी सुरु आहे. अशातच विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 7 जागांसाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यावरूनच शिंदे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

शिंदे सरकार संविधान आणि न्यायालयाला मानत नाही; मोदींचा हल्लाबोल
देवेंद्र फडवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारImage Credit source: ANI
| Updated on: Oct 15, 2024 | 11:37 AM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. त्याआधी महायुतीकडून काल राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी नावं पाठवली गेली आहेत. 12 पैकी 7 जागांसाठी महायुतीने नावांचा प्रस्ताव महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवला आहे. मात्र या सगळ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या नियुक्तीला याआधी आव्हान देण्यात आलं होतं. त्या याचिकेवरची सुनावणी अद्याप प्रलंबित असताना नव्याने नावांची यादी पाठवण्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सरकार संविधान आणि न्यायालयाला मानत नाही, हे अनेकदा सिद्ध झालं होतं. या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असं सुनील मोदी म्हणालेत.

राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्तीवर आक्षेप

दोन वर्षांपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 आमदारा संदर्भात मी सर्वोच्च न्यायालय गेलो होतो. त्यानंतर उच्च न्यायालयात आलो. उच्च न्यायालयात आमच्या याचिकेवर युक्तिवाद पूर्ण झाला आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने ही याचिका रिझर्व फॉर जजमेंटसाठी ठेवली आहे. रिझर्व फॉर जजमेंटला ठेवल्यानंतर अशी असे निर्णय घेता येणार नाहीत. हे सरकार संविधान आणि न्यायालयाला मानत नाही हे अनेकदा सिद्ध झालं होतं. या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असं सुनील मोदी म्हणालेत.

सुनील मोदी काय म्हणाले?

न्यायालयाने जर या सर्वांच्या विरोधात निर्णय दिला तर हे सात आमदार होऊ शकतील का? 12 आमदार का नियुक्त केले नाहीत सातच आमदार का नियुक्त केले असे सगळे प्रश्न आहेत. आम्ही यात या संदर्भात आजउच्च न्यायालयात मेन्शन दाखल करणार आहोत. ही सरळ सरळ जनतेची फसवणूक आहे आणि घटनेचा अवमान आहे. 48 तासात हे सगळं करायचं काम सरकार करता हे असंविधानिक आहे. जनता त्यांना या सगळ्याचा धडा येत्या निवडणुकीत शिकवेल. पंधरा दिवसात 3600 निर्णय सरकारने घेतले आहेत. दोन वर्ष हे सरकार झोपला होतो का? असे सगळे निर्णय घेऊन सरकार गोंधळाची स्थिती निर्माण करते. या आमदार नियुक्तीवर न्यायालय काहीतरी हस्तक्षेप करेल. तुम्ही आज ज्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्या माझ्या निर्णयाला अधीन राहून करावे लागतील असं न्यायालय म्हणू शकतो, असं सुनील मोदी म्हणाले.

ज्यांचा चा पराभव होणार आहे त्यांचे ऍडजेस्टमेंट म्हणून ही नाव दिले गेले आहे. विशिष्ट समाजाची मतं येणाऱ्या निवडणुकीत मिळतील असं गृहीत धरून ही नाव गडबडीत दिली गेली असतील. नावच द्यायचे असती तर महाविकास आघाडीने दिलेली बारा नाव रद्द करून महायुतीची बारा नाव दिली असती मात्र यांना सरळ मार्गे काम करायचं नाही हे यातून दिसते, असंही सुनील मोदी म्हणालेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.