AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या आमदारांनी मंदिरांच्या जमिनी लाटल्या…जयंत पाटील यांचा मोठा आरोप

ncp jayant patil speech: महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. महाराष्ट्र सरकार हे घाबरलेले सरकार आहे. त्यांना निवडणुकीची भीती आहे. ते प्रत्येक निवडणुकीला घाबरत आहे. मागील दोन वर्षांत त्यांनी जसे काम केले आहे, त्यामुळे ते धास्तावले आहेत. निवडणूक ऑक्टोंबरमध्ये घेण्याचे धाडस ते करणार नाहीत.

भाजपच्या आमदारांनी मंदिरांच्या जमिनी लाटल्या...जयंत पाटील यांचा मोठा आरोप
जयंत पाटीलImage Credit source: Facebook
| Updated on: Aug 16, 2024 | 12:22 PM
Share

हिंदू देवस्थानांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जमिनी दिल्या गेल्या आहेत. परंतु भाजपच्या एक दोन आमदारांनी मंदिराच्या जमिनी लाटल्या आहेत. या जमिनी घेताना नजराणा भरायचा असतो. परंतु त्यांनी ५० टक्के नजराणा भरला. हा विषय मी दोन वेळा विधानसभेत काढला. आता परवा नजराण्याची रक्कम कमी केली आहे. महाराष्ट्रात हिंदू देवस्थानाच्या जमिनी विकण्याचे पाप भाजपकडे जात आहे. या जमिनीसंदर्भात कोर्टात तक्रारी गेल्या आहेत. सरकारकडून हिंदूच्या मंदिरांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. भारतीय जनता पक्षाचे लोकच मंदिराच्या जमिनी लाटत आहेत. मंदिराच्या जमिनी लाटण्याचे काम भाजपने केले आहे. देवस्थानच्या जमिनी बिल्डराच्या ताब्यात दिल्या जात आहेत. महाराष्ट्र सरकारचा लुटालुटीचा कारभार सुरु आहे, असा घाणाघाती हल्ला भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला.

४०० पारचा नारा केला, पण…

महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. महाराष्ट्र सरकार हे घाबरलेले सरकार आहे. त्यांना निवडणुकीची भीती आहे. ते प्रत्येक निवडणुकीला घाबरत आहे. मागील दोन वर्षांत त्यांनी जसे काम केले आहे, त्यामुळे ते धास्तावले आहेत. निवडणूक ऑक्टोंबरमध्ये घेण्याचे धाडस ते करणार नाहीत. ते दिवाळी झाल्यानंतरच निवडणुका घेणार आहेत. लोकसभेत ४०० पारचा नारा केला, पण ते २४० जागांवर थांबले. त्यांना बिहार आणि आंध्र प्रदेशाचा टेकू मिळाले. परंतु ते पलटी मारु लोक आहेत. हे सरकार कधी खाली येईल, त्याचे नेम नाही. फक्त आता सहा वर्ष की एक वर्ष हे बाकी आहे.

विधानसभा निवडणुका आता येणार आहे. आपण एकत्र राहिले तर हे सरकार आपलेच असणार आहे. साताऱ्यात पिपाणीला ३७ हजार मते गेली, त्यामुळे आमची जागा गेली. मुंबईतील आमची जागा चोरली. विधानसभेचे काम आपण सुरु केले आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि महत्वाची आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी एकत्र राहून काम करणे गरजेचे आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.