AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करुन दाखवला… अयोध्येतील भाजपच्या पराभवावर उद्धव ठाकरे यांचा टोला

uddhav thackeray on bjp: नरेंद्र मोदी यांना समजायला पाहिजे होते की, संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिले होते. परंतु त्यांना ते समजले नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनतेने धडा दिला. आता कसेबसे त्यांचे पंतप्रधानपद वाचले आहे. आता त्यांचे सरकार किती दिवस राहील सांगता येत नाही.

अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करुन दाखवला... अयोध्येतील भाजपच्या पराभवावर उद्धव ठाकरे यांचा टोला
ram mandir uddhav thackeray
| Updated on: Jun 15, 2024 | 3:25 PM
Share

लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात चांगलाच फटका बसला. लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराची केलेली प्राणप्रतिष्ठा भाजपला उत्तर प्रदेशात यश मिळवून देऊ शकली नाही. अगदी अयोध्या ज्या मतदार संघात येते त्या फैजाबाद लोकसभा मतदार संघातही भाजपचा पराभव झाला. त्यावरुन शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलेच घेरले. शनिवारी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करुन दाखवला, असा खोचक टोला लगावला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीने शनिवारी राज्यातील जनतेचे आभार मानण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नाशिकमध्ये २२ जानेवारी रोजी सभा घेतली होती. त्या दिवशी मी काळाराम मंदिरात भगवान रामाचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपमुक्त राम हवा आहे. मग हा भाजपमुक्त राम अयोध्यावासियांनी करुन दाखवला. त्या ठिकाणी भाजपला यश मिळाले नाही.

मोदींचे पद कसेबसे वाचले

नरेंद्र मोदी यांना समजायला पाहिजे होते की, संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिले होते. परंतु त्यांना ते समजले नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनतेने धडा दिला. आता कसेबसे त्यांचे पंतप्रधानपद वाचले आहे. आता त्यांचे सरकार किती दिवस राहील सांगता येत नाही. गुजरातबाबत चालुगिरी करायला लागले, तर त्यांच्या मूळ राज्यातच त्यांना सुरुंग लागेल. नरेटिव्ह म्हणता, ते खोटे आहे. पण यांच्यात खरेपणा नाही. त्यांचा फोलपणा समोर आला आहे. देशातील जनता जागी झाली. मोदींवर लोकांचा विश्वास होता. तो उडाला आहे. आता पुढील निवडणुकीत देशाचं चित्र अधिक चांगलं राहील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आमच्यासोबत येणाऱ्यांचे स्वागत

काही लोक आमच्यासोबत होते. त्यांना घेऊन पुढे जाऊ. कुणी जर आमच्यासोबत येत असतील. कोणतीही अट आणि ओढताण न करता येत असतील तर त्यांनी यावे. मी हे सर्वांसंदर्भात बोलत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

हे ही वाचा

लोकसभेपेक्षा विधानसभेची निवडणूक अधिक ताकदीने लढणार… महाविकास आघाडीने विधानसभेचे रणशिंग फुंकले

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.