AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : आम्ही तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊतांनी महायुतीवर केला प्रहार

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता टिपेला पोहचला आहे. संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार यांचा त्यांनी तिखीट समाचार घेतला.बारामतीत आमची सगळी शिवसेना सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

Sanjay Raut : आम्ही तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊतांनी महायुतीवर केला प्रहार
संजय राऊत यांचा हल्लाबोल
| Updated on: Apr 28, 2024 | 2:04 PM
Share

राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष आता बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. बारामतीची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. पण आता तिथे पवार-विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. बारामतीत आमचेच पारडे जड यासाठी दोन्ही गट दंड बैठका मारत आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी आमची सगळी शिवसेना भक्कमपणे उभी असल्याचे संजय राऊत यांनी पुरंदरमधील प्रचार सभेतून सांगितले. यावेळी त्यांनी अजितदादांवर हल्लाबोल केला.

आम्ही तुमची चांगलीच तुतारी वाजवणार

ज्या पवारांनी पक्ष वाढवायला तुमच्या हातात दिला, तुम्ही कायं केलं, असा हल्लाबोल त्यांनी अजित पवार यांच्यावर केला. आचार्य अत्रे म्हणले असते असे हरामखोर 10 हजार वर्षात झाले नाही असे म्हणाले असते. तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्ही आता तुमची तुतारी चांगली वाजवणार आहे. आमची सगळी शिवसेना ताईच्या मागे ठाम पणे उभी आहे, असे ते म्हणाले. कोणीतरी ऐरेंगेरे गुजरातमधून येणारं आणि आमच्या पराभवासाठी बारामती ठाणं मांडून बसणार आहे. चंद्रकांत पाटील म्हणतात आम्ही शरद पवार यांना संपवायचं आहे. आले किती गेले किती बारामतीमध्ये शरद पवार यांचा दरारा असल्याचे ते म्हणाले.

निकालानंतर जनता तुम्हाला बघणार

अजित पवार यांचं काल भाषण ऐकलं, माझं कामं कर नाहीतर बघून घेईल. अरे तुम्ही कायं बघणार 4 जून नंतर तुम्हाला जनता बघून घेईल. तुमच्या धमक्यांना जनता घाबरणार नाही. धमक्या देऊन निवडणूक लढवू नका, जनता तुमच्या धमक्याला भीक घालणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी अजितदादा यांच्यावर केला.

पंतप्रधानांना महाराष्ट्राची भीती

रोज बघावं तेंव्हा नरेंद्र मोदी, शहा महाराष्ट्रमध्ये आहेत, सगळा देश सोडला आणि महाराष्ट्रमध्ये येतं आहेत. त्यांना महाराष्ट्रची भीती वाटत असल्याचा चिमटा राऊत यांनी काढला. गेली 10 वर्ष पंतप्रधान नुसतं खोट बोलत आहेत. आम्ही विचार करतोय, नरेंद्र मोदी औरंगजेब सारखे का वागतात, त्याचा जन्म गुजरात मध्ये झाला होता. त्यामुळं ते शिवराय यांच्या महाराष्ट्रवर धावून येते आहेत. कोणी चाल करून येत असेल तर त्यांचा मान आम्ही राखणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!