AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘… म्हणून ठाकरे बंधुंना एकही जागा मिळाली नाही’, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं कारण

बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. आता ठाकरे बंधुंच्या या पराभवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

'... म्हणून ठाकरे बंधुंना एकही जागा मिळाली नाही', मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं कारण
Fadnavis-Uddhav-and-Raj-Thackeray-
| Updated on: Aug 20, 2025 | 5:15 PM
Share

बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी युती केली होती. मात्र मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. या निवडणूकीत शशांक राव यांच्या पॅनलचे 14 उमेदवार निवडून आले आहेत. तसेच प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार निवडून आले आहेत. अशातच आता ठाकरे बंधुंच्या या पराभवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

पुण्यात पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाकरे बंधुंच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीतील पराभवाबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माझं हे मत होतं की, अशाप्रकारच्या पतपेढीच्या निवडणूकीचे राजकीयकरण करु नये. मात्र ठाकरे बंधुंनी त्याचं राजकारण केलं. शशांक राव आणि प्रसाद लाड हे आमचे नेते आहेत, मात्र आम्ही राजकीयकरण केलं नाही.’

पुढे बोलताना, ‘आता दोन ठाकरे बंधु एकत्र आले, आता ठाकरे ब्रँण्ड निवडून येणार असं त्यांनी राजकीयकरण केलं. मात्र हे राजकीयकरण लोकांना आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे त्यांना एकही जागा मिळालेली नाही, या निवडणूकीत तरी त्यांना लोकांनी रिजेक्ट केलं आहे असं चित्र दिसत आहे’ असं विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे.

आशिष शेलार यांचा ठाकरे बंधुंना टोला

बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले की, ‘आता भूमिका स्पष्ट झाल्या आहेत भाजप पक्ष म्हणून आम्ही या निवडणुकीत उतरलो नव्हतो. ही निवडणूक कामगारांची होती बेस्ट वर प्रेम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती. याचं राजकीय करण उबाठा आणि मनसेने केले. प्रत्येक गोष्टीच राजकारण करण याच फळ त्यांना मिळालं आणि हाती भोपळा आला. 0 + 0 हा शून्यच हे मी आधीही म्हणालो होतो. आज मुंबईचा विजय झाला, मुंबईकरांचा विजय झाला, मराठीचा विजय झाला, कामगारांचा विजय झाला.

शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्यावर महत्वाची जबाबदारी

पुढे बोलताना शेलार म्हणाले की, ‘मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून मी आज जाहीर करतो की, मुंबई महानगरपालिकेच्या स्टार प्रचारकांची मोठी यादी जाहीर होईलच, पण स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांची नावे मी आज जाहीर करत आहे. या दोघांनीच बेस्टच्या निवडणुकीत या दोन्ही भावांच्या पक्षाला मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे आहे हे दाखवून दिले.’

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.