AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Pakistan : ‘मला वाटतं 5 विमानं पाडली’; भारत-पाक तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबजनक दावा, देशात वाद पेटणार

India-Pakistan Conflict : भारत-पाक संघर्षा दरम्यान ऑपरेशन सिंदूरने पाकड्यांचे कंबरडे मोडले. पण भारताची यामध्ये किती विमान पाडल्या गेली यावरून पाक आणि इतरांचे दावे आहेत. भारताकडून याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या नवीन दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

India-Pakistan : 'मला वाटतं 5 विमानं पाडली'; भारत-पाक तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबजनक दावा, देशात वाद पेटणार
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 19, 2025 | 9:55 AM
Share

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. एकूण 9 ठिकाणी लष्कराने शत्रूंचा अचूक वेध घेतला. अनेक दहशतवादी या हल्ल्यात ठार झाले. ऑपरेशन सिंदूरने पाकड्यांचे कंबरडे मोडले. या युद्धात भारताची विमानं पाडल्याचा दावा पाकने केले होता. भारताकडून याविषयीची अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. काय म्हणाले ट्रम्प?

5 विमानं पाडली

दोन्ही देशात परिस्थिती अत्यंत गंभीर होती. दोन्ही देशांकडे अणूशक्ती आहे. दोन्ही देश एकमेकांविरोधात हल्ले करत होते. एकमेकांची विमानं ते लक्ष्य करत होती. मला वाटतं 5 विमानं पाडण्यात आली. असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. आता ही विमान कोणत्या देशाची पाडली हे त्यांनी स्पष्ट केले नाही. पण त्यांच्या या दाव्याने वादाला तोंड फुटले आहे.

दोन्ही देशात शांततेचे घेतले क्रेडिट

डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 मे 2025 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता करार झाल्याचे त्यांच्या एक्स हँडलवरून जाहीर केले होते. त्याचदिवशी संध्याकाळी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. आपण व्यापार थांबवण्याची धमकी दिल्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला आहे. पाकिस्तानच्या काही मंत्र्यांनी तर युएई आणि अरब देशांच्या मध्यस्थीने तणाव निवाळल्याचे म्हटले होते. पण आता ट्रम्प यांनी पुन्हा भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आपल्याचमुळे निवळल्याचा दावा केला आहे.

आम्ही जगात सुरू असलेली अनेक युद्ध थांबवली. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत जात होता. तो दोनच दिवसात वाढला होता. आम्ही हा तणाव व्यापाराद्वारे थांबवला. जर तुम्ही लष्करी सामग्री, शस्त्रांचा अथवा अणू अस्त्रांचा वापर करणार असाल तर आम्ही तुमच्याशी व्यापारी करार करणार नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला. इराण अणू शक्ती कार्यक्रम नष्ट करण्यातही अमेरिकेने मोठी भूमिका निभावल्याचे ते म्हणाले.

Follow Us
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.