Sanjay Raut: आता सोडणार नाही… राऊत संतापले… कायद्याचा बडगा… बंडखोरांना तो थेट इशारा
Sanjay Raut on Uddhav Thackeray Shivsena Split: अजून कोणत्याही खासदाराने आम्हाला पक्ष सोडत असल्याचे सांगितले नाही. पण अशा पद्धतीने पक्ष तोडले, फोडले जात असतील, तर आता सोपं नाही असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.

Sanjay Raut on Uddhav Thackeray Shivsena Split: उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांनी राजकारण ढवळून निघाले. या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडत आहेत. खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे यांची संयुक्त पत्रकार परिषद दिल्लीत सुरू आहे. त्यात या पक्ष फुटीवर त्यांनी भाष्य केले आहे. या सर्व घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. अजून कोणीही पक्ष सोडून गेल्याची माहिती दिली नसल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी राऊतांनी मोठा इशारा दिला.
हा नादानपणा खपवून घेणार नाही
अशा पद्धतीने पक्ष तोडले, फोडले जात असतील, तर या देशात निवडणुका लढण्याला अर्थ नाही. आमच्या खासदारांची जी नावे येतात ते कुठे आहेत माहीत नाही. कुणी म्हणतात, दिल्लीत आहेत. कुणी म्हणतात त्यांच्या मतदारसंघात आहे. हे सर्व खासदार मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले. आधी फूट पडली, तेव्हा मोदींच्या नावावर निवडणूक लढवली. मॅनडेटच्या विरोधात आहे, असं सांगितलं जात होतं. आता जे खासदार आमदार असतील ते पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निवडून आले. आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आलेले असताना कुणालाही बेईमानी करण्याचा अधिकार नाही. १५-२० कोटी घेऊन. या क्षणी कुणावर आरोप करणार नाही. मागे जे झालं, त्याची पुनरावृत्ती होणरा असेल तर जनता गप्प बसणार नाही. शिवसेना नाहीच. जो राडा व्हायचा तो होईल. ही गांडूगिरी, नादाणपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम खासदार संजय राऊत यांनी दिला.
तर राजीनामा फेका
उद्धव ठाकरेंनी सर्व काही दिलं. रक्त,पैसा दिला. मेहनत घेतली. तरीही त्यांच्याबाबत अशा बातम्या येत असतील तर त्याचं त्यांनी खंडन करावं. आता त्यांना सोडणार नाही. कोणी फुटणार असेल तर सोडणार नाही. राज्यातील जनता चूप बसणार नाही. हा काय तमाशा आहे का. जायचं त्यांनी राजीनामा द्या. तुम्ही आमच्या पार्टीतून निवडून आला आहे. तीन वेळा पडणाऱ्याला खासदार बनवलं. एक पळून जात होता त्याला खासदार बनवलं.आम्ही कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. ओम बिर्लांना पत्र पाठवलं आहे. आम्ही दिल्लीत राहणार आहोत, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.
