शेतकरी आंदोलनाचा आजचा 37 वा दिवस आहे. शेतकरी प्रतिनिधी आणि सरकार यांच्यामध्ये आतापर्यंत अनेक बैठका झाल्या. मात्र, अजूनही या बैठकांमधून पूर्ण तोडगा निघालेला नाही.
1 / 5
शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांचं 50 टक्के समाधान झाल्याचं सांगतिलं होतं. तसेच आगामी 4 जानेवारीच्या बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा होईल असेही ते म्हणाले.
2 / 5
दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना शुक्रवारी (31 डिसेंबर) नमन करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
3 / 5
या आंदोलनात आतापर्यंत 40 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर मेणबत्त्या, दिवे प्रज्वलित करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
4 / 5
यावेळी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. शेतकरी प्रतिनिधी आणि सरकारमध्ये 4 जानेवारीला पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीत सहमती नसलेल्या मुद्द्यांवर तोडगा निघणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.