AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 स्थानके, 261 किमी मार्ग… बीडच्या पहिल्या रेल्वेची वैशिष्ट्ये माहितीये का?

अहमदनगर ते बीड या नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन झाल्याने बीड जिल्ह्यातील दीर्घकाळापासूनचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटनामुळे बीडकरांमध्ये मोठा उत्साह आहे.

| Updated on: Sep 17, 2025 | 4:13 PM
Share
बीड शहर आणि जिल्ह्यासाठी रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने अहमदनगर ते बीड या नवीन रेल्वे मार्गावर पहिली प्रवासी रेल्वे धावली आहे.

बीड शहर आणि जिल्ह्यासाठी रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने अहमदनगर ते बीड या नवीन रेल्वे मार्गावर पहिली प्रवासी रेल्वे धावली आहे.

1 / 10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अहमदनगर ते बीड या नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बीडकरांनी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अहमदनगर ते बीड या नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बीडकरांनी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

2 / 10
बीड जिल्ह्याला रेल्वे मार्गाशी जोडण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. दिवंगत नेत्या केसरकाकू क्षीरसागर यांनी पहिल्यांदा ही मागणी केली होती. त्यानंतर, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि इतर नेत्यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

बीड जिल्ह्याला रेल्वे मार्गाशी जोडण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. दिवंगत नेत्या केसरकाकू क्षीरसागर यांनी पहिल्यांदा ही मागणी केली होती. त्यानंतर, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि इतर नेत्यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

3 / 10
आता विद्यमान खासदारांच्या कार्यकाळात हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. यामुळे, बीड जिल्ह्यातील प्रवाशांना अहमदनगर आणि इतर मोठ्या शहरांमध्ये जाता येणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे बीड आणि परिसरातील नागरिकांना अनेक फायदे मिळणार आहेत.

आता विद्यमान खासदारांच्या कार्यकाळात हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. यामुळे, बीड जिल्ह्यातील प्रवाशांना अहमदनगर आणि इतर मोठ्या शहरांमध्ये जाता येणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे बीड आणि परिसरातील नागरिकांना अनेक फायदे मिळणार आहेत.

4 / 10
अहमदनगर ते बीड हा प्रवास आता अधिक सोयीस्कर जलद आणि सुरक्षित झाला आहे. या प्रवासाला अंदाजे 5 तासांचा वेळ लागणार आहे. या रेल्वेमुळे मालवाहतूक सोपी झाली आहे.

अहमदनगर ते बीड हा प्रवास आता अधिक सोयीस्कर जलद आणि सुरक्षित झाला आहे. या प्रवासाला अंदाजे 5 तासांचा वेळ लागणार आहे. या रेल्वेमुळे मालवाहतूक सोपी झाली आहे.

5 / 10
त्यामुळे स्थानिक शेती, उद्योग आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

त्यामुळे स्थानिक शेती, उद्योग आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

6 / 10
या मार्गावर एकूण 16 रेल्वे स्थानके आहेत. जतनंदुर, विघ्नवाडी, रायमोहा, राजुरी (नवगण) आणि बीड ही या रेल्वेवरील महत्त्वाची स्थानकं आहेत. यामुळे आसपासच्या गावांनाही शहरांशी सहज जोडणं शक्य होणार आहे.

या मार्गावर एकूण 16 रेल्वे स्थानके आहेत. जतनंदुर, विघ्नवाडी, रायमोहा, राजुरी (नवगण) आणि बीड ही या रेल्वेवरील महत्त्वाची स्थानकं आहेत. यामुळे आसपासच्या गावांनाही शहरांशी सहज जोडणं शक्य होणार आहे.

7 / 10
अहमदनगर ते बीड रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. यात अमळनेर ते बीड हा 67.78 किलोमीटर लांबीचा टप्पा पूर्ण झाला आहे. यासाठी 1286 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

अहमदनगर ते बीड रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. यात अमळनेर ते बीड हा 67.78 किलोमीटर लांबीचा टप्पा पूर्ण झाला आहे. यासाठी 1286 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

8 / 10
आता यातील दुसऱ्या टप्प्यात 15 मोठे पूल, 90 छोटे पूल, 15 रोड ओव्हर ब्रिज आणि 31 रेल्वे अंडर ब्रिजची कामे सुरू आहेत.

आता यातील दुसऱ्या टप्प्यात 15 मोठे पूल, 90 छोटे पूल, 15 रोड ओव्हर ब्रिज आणि 31 रेल्वे अंडर ब्रिजची कामे सुरू आहेत.

9 / 10
या रेल्वेच्या उद्घाटनामुळे बीड जिल्ह्यासाठी विकासाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने निधी देऊन बीडकरांची स्वप्नपूर्ती केली आहे.

या रेल्वेच्या उद्घाटनामुळे बीड जिल्ह्यासाठी विकासाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने निधी देऊन बीडकरांची स्वप्नपूर्ती केली आहे.

10 / 10
Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत