AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मिरी मुस्लीमशी लग्नानंतर उर्मिला मातोंडकरने केलं होतं धर्मांतर?

अभिनेत्री उर्मिता मातोंडकर लग्नाच्या आठ वर्षांनंतर पती मोहसिन अख्तर मीरला घटस्फोट देणार असल्याची बातमी समोर येत आहे. उर्मिलाने 2016 मध्ये तिच्यापेक्षा वयाने 10 वर्षांनी लहान मोहसिनशी लग्न केलं होतं. त्यावेळी उर्मिलाच्या धर्मांतराच्याही चर्चा होत्या.

| Updated on: Sep 25, 2024 | 12:06 PM
Share
लग्नाच्या आठ वर्षांनंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पती मोहसीन अख्तर मीरपासून विभक्त होणार असल्याची बातमी समोर येत आहे. 2016 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रामुळे या दोघांची एकमेकांशी भेट झाली होती. लग्नानंतर उर्मिलाने धर्मांतर केल्याची त्यावेळी खूप चर्चा होती.

लग्नाच्या आठ वर्षांनंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पती मोहसीन अख्तर मीरपासून विभक्त होणार असल्याची बातमी समोर येत आहे. 2016 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रामुळे या दोघांची एकमेकांशी भेट झाली होती. लग्नानंतर उर्मिलाने धर्मांतर केल्याची त्यावेळी खूप चर्चा होती.

1 / 5
मोहसीन हा उर्मिलापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान असून तो काश्मिरी बिझनेसमन, अभिनेता आणि मॉडेल आहे. मोहसिनशी लग्न केल्यानंतर उर्मिलाने इस्लाम धर्म स्वीकारल्याची चर्चा होती. त्यावर 'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत उर्मिलाने स्पष्टीकरण दिलं होतं.

मोहसीन हा उर्मिलापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान असून तो काश्मिरी बिझनेसमन, अभिनेता आणि मॉडेल आहे. मोहसिनशी लग्न केल्यानंतर उर्मिलाने इस्लाम धर्म स्वीकारल्याची चर्चा होती. त्यावर 'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत उर्मिलाने स्पष्टीकरण दिलं होतं.

2 / 5
"अशा अफवा पसरवणं खूप चुकीचं आहे. अशा पद्धतीचं राजकारण मला अजिबात आवडत नाही. जरी मी धर्मांतर केलं तरी काय फरक पडणार आहे? मी नेहमीच माझ्या मर्जीनुसार वागले आणि ताठ मानाने प्रत्येक निर्णय घेतले आहेत. मला स्वत:वर खूप अभिमान आहे. मी असं म्हणत नाही की मी कधीही चुकले नाही, परंतु मला लाज वाटावी अशा गोष्टी मी कधीही केल्या नाहीत", असं उर्मिला म्हणाली होती.

"अशा अफवा पसरवणं खूप चुकीचं आहे. अशा पद्धतीचं राजकारण मला अजिबात आवडत नाही. जरी मी धर्मांतर केलं तरी काय फरक पडणार आहे? मी नेहमीच माझ्या मर्जीनुसार वागले आणि ताठ मानाने प्रत्येक निर्णय घेतले आहेत. मला स्वत:वर खूप अभिमान आहे. मी असं म्हणत नाही की मी कधीही चुकले नाही, परंतु मला लाज वाटावी अशा गोष्टी मी कधीही केल्या नाहीत", असं उर्मिला म्हणाली होती.

3 / 5
"ज्या इंडस्ट्रीत मी काम करत होते, तिथे राहून नकारात्मकता, गॉसिप, एकमेकांच्या मागून बोलणं या सर्वांपासून लांब राहण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मी कधीच या गोष्टी केल्या नाहीत. त्यामुळे धर्मांतराच्या चर्चांमुळे मी खूप चकीत झाले. मी हिंदू आहे आणि त्याच धर्माचं पालन करते. परंतु मी हिंदू धर्मावर व्यापक अर्थाने विश्वास ठेवते. हल्ली आपल्यावर ते थोपवलं जातं, त्यावर नाही", असं उर्मिलाने स्पष्ट केलं होतं.

"ज्या इंडस्ट्रीत मी काम करत होते, तिथे राहून नकारात्मकता, गॉसिप, एकमेकांच्या मागून बोलणं या सर्वांपासून लांब राहण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मी कधीच या गोष्टी केल्या नाहीत. त्यामुळे धर्मांतराच्या चर्चांमुळे मी खूप चकीत झाले. मी हिंदू आहे आणि त्याच धर्माचं पालन करते. परंतु मी हिंदू धर्मावर व्यापक अर्थाने विश्वास ठेवते. हल्ली आपल्यावर ते थोपवलं जातं, त्यावर नाही", असं उर्मिलाने स्पष्ट केलं होतं.

4 / 5
धर्मांतराविषयी ती पुढे म्हणाली, "जरी मी इस्लाम धर्म स्वीकारला असता तरी ती गोष्ट मी अभिमानाने सांगितली असती. तरीसुद्धा माझ्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याचा अधिकार कोणालाच नाही. मी मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्याने धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलतेय, असं नाही. उलट मला त्यावर विश्वास आहे आणि दुसऱ्या धर्मात लग्न करण्याविषयीचे माझे विचार आधीपासूनच स्पष्ट होते, म्हणून बोलतेय."

धर्मांतराविषयी ती पुढे म्हणाली, "जरी मी इस्लाम धर्म स्वीकारला असता तरी ती गोष्ट मी अभिमानाने सांगितली असती. तरीसुद्धा माझ्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याचा अधिकार कोणालाच नाही. मी मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्याने धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलतेय, असं नाही. उलट मला त्यावर विश्वास आहे आणि दुसऱ्या धर्मात लग्न करण्याविषयीचे माझे विचार आधीपासूनच स्पष्ट होते, म्हणून बोलतेय."

5 / 5
Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच