मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्यानं दादर, लालबाग, परळ, प्रभादेवी, वडाळा, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, बोरिवली, मालाड, कांदिवलीसह कर्जत-कसारा भागातीलही बत्ती गुल झाली आहे.
1 / 6
टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यानं पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.
2 / 6
बत्ती गुल झाल्यानं मुंबई थांबली. विजेअभावी रेल्वेच्या तिन्ही लाईन ठप्प झाल्या आहेत. लोकल थांबल्यानं प्रवासी हवालदिल झाले आहेत.
3 / 6
मुंबई परिसरात असणाऱ्या सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील कामकाजही लाईट गेल्यामुळे ठप्प झाले आहे.
4 / 6
मुंबई-ठाण्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने इंटरनेटही बंद झालं असून त्यामुळे सोशल मीडियावरील मेसेजचं आदान-प्रदानही थांबलं आहे.
5 / 6
वीज पुरवठा खंडित झाल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं चित्र आहे.