AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्य दरवाजावर लावलेले तोरण नक्की केव्हा बदलावे? वास्तुशास्त्र काय सांगते?

घराच्या मुख्य दरवाजावर लावलेले तोरण नक्की कधी बदलावे? वास्तुशास्त्रानुसार सुकलेले किंवा जुने तोरण घरात कोणती नकारात्मकता आणू शकते आणि तोरण लावण्याचे योग्य नियम काय आहेत, याची माहिती जाणून घ्या.

| Updated on: Apr 09, 2026 | 2:43 PM
Share
भारतीय संस्कृतीत सण-समारंभ किंवा दैनंदिन आयुष्यातही घराच्या मुख्य दरवाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घराचा मुख्य दरवाजा हे केवळ प्रवेशद्वार नसून तो सकारात्मक ऊर्जेचा मुख्य स्त्रोत मानला जातो. याच कारणाने लोक आपल्या दारावर अशोक किंवा आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. मात्र हे तोरण लावताना आणि तसेच ते बदलताना काही वास्तु नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

भारतीय संस्कृतीत सण-समारंभ किंवा दैनंदिन आयुष्यातही घराच्या मुख्य दरवाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घराचा मुख्य दरवाजा हे केवळ प्रवेशद्वार नसून तो सकारात्मक ऊर्जेचा मुख्य स्त्रोत मानला जातो. याच कारणाने लोक आपल्या दारावर अशोक किंवा आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. मात्र हे तोरण लावताना आणि तसेच ते बदलताना काही वास्तु नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

1 / 8
वास्तुशास्त्रानुसार, घराचा प्रत्येक कोपरा महत्त्वाचा असला तरी मुख्य दरवाजा हा सर्वात प्रभावशाली भाग असतो. या ठिकाणहून घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. दरवाजा सुशोभित आणि स्वच्छ ठेवल्यास घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. तोरण हे शुभशकुनाचे प्रतीक मानले जाते, जे वाईट शक्तींना घराबाहेर रोखण्याचे काम करते.

वास्तुशास्त्रानुसार, घराचा प्रत्येक कोपरा महत्त्वाचा असला तरी मुख्य दरवाजा हा सर्वात प्रभावशाली भाग असतो. या ठिकाणहून घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. दरवाजा सुशोभित आणि स्वच्छ ठेवल्यास घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. तोरण हे शुभशकुनाचे प्रतीक मानले जाते, जे वाईट शक्तींना घराबाहेर रोखण्याचे काम करते.

2 / 8
आजकाल अनेकजण प्लास्टिकची तोरणे वापरतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार ताज्या फुलांच्या आणि पानांच्या तोरणाला सर्वाधिक पसंती दिली जाते. जर तुम्ही खऱ्या पाना-फुलांचे तोरण लावत असाल तर मग काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे असते.

आजकाल अनेकजण प्लास्टिकची तोरणे वापरतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार ताज्या फुलांच्या आणि पानांच्या तोरणाला सर्वाधिक पसंती दिली जाते. जर तुम्ही खऱ्या पाना-फुलांचे तोरण लावत असाल तर मग काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे असते.

3 / 8
ताजी फुले किंवा पाने साधारणपणे ३ ते ५ दिवसांत किंवा जास्तीत जास्त एक आठवड्यात सुकतात. शास्त्रानुसार, पाने सुकल्यानंतर ती लगेच बदलणे आवश्यक आहे. सुकलेली पाने नकारात्मकता दर्शवतात, त्यामुळे ती दारावर टांगून ठेवणे टाळावे.

ताजी फुले किंवा पाने साधारणपणे ३ ते ५ दिवसांत किंवा जास्तीत जास्त एक आठवड्यात सुकतात. शास्त्रानुसार, पाने सुकल्यानंतर ती लगेच बदलणे आवश्यक आहे. सुकलेली पाने नकारात्मकता दर्शवतात, त्यामुळे ती दारावर टांगून ठेवणे टाळावे.

4 / 8
जर तुम्ही कापड, मणी किंवा प्लास्टिकपासून बनवलेले तोरण वापरत असाल, तर त्यासाठी वेगळे नियम असतात. कृत्रिम तोरणांवर धूळ लवकर साचते. धूळ लागलेले तोरण वास्तुदोष निर्माण करू शकते. त्यामुळे दर दोन आठवड्यांनी हे तोरण काढून स्वच्छ धुवावे किंवा पुसून घ्यावे.

जर तुम्ही कापड, मणी किंवा प्लास्टिकपासून बनवलेले तोरण वापरत असाल, तर त्यासाठी वेगळे नियम असतात. कृत्रिम तोरणांवर धूळ लवकर साचते. धूळ लागलेले तोरण वास्तुदोष निर्माण करू शकते. त्यामुळे दर दोन आठवड्यांनी हे तोरण काढून स्वच्छ धुवावे किंवा पुसून घ्यावे.

5 / 8
जर तोरणाचे मणी निखळले असतील किंवा धागे तुटले असतील, तर असे तोरण त्वरित बदलावे. तुटलेल्या वस्तू घरात गरिबी आणि तणाव ओढवून आणतात. तोरण लावण्यासोबतच मुख्य दरवाजाचा परिसर नेहमी स्वच्छ असावा. दारासमोर चपलांचा ढिगारा किंवा कचरा नसावा.

जर तोरणाचे मणी निखळले असतील किंवा धागे तुटले असतील, तर असे तोरण त्वरित बदलावे. तुटलेल्या वस्तू घरात गरिबी आणि तणाव ओढवून आणतात. तोरण लावण्यासोबतच मुख्य दरवाजाचा परिसर नेहमी स्वच्छ असावा. दारासमोर चपलांचा ढिगारा किंवा कचरा नसावा.

6 / 8
सुंदर तोरणाने सजवलेला दरवाजा तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून प्रगतीचे मार्ग मोकळे करतो. त्यामुळे, जर तुमच्याही घराच्या दारावरचे तोरण सुकले असेल किंवा जुने झाले असेल, तर आजच ते बदलून घरामध्ये नवीन चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करा.

सुंदर तोरणाने सजवलेला दरवाजा तुमच्या जीवनातील अडथळे दूर करून प्रगतीचे मार्ग मोकळे करतो. त्यामुळे, जर तुमच्याही घराच्या दारावरचे तोरण सुकले असेल किंवा जुने झाले असेल, तर आजच ते बदलून घरामध्ये नवीन चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करा.

7 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्हिडीओ
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले...
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी...  नेमकं प्रकरण काय?
प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
Raksha Bandhan 2026 | प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video पहा
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
Manoj Jarange On Hunger Strike | 'कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य,
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य, पाहा मनमोहक दृश्य
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर; 12 तासांतच
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच...
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल