AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDvsAUS : टीम इंडियाचा पराभव आणि ‘खेळ खल्लास’, इंदूरमध्ये मोठा उलटफेर

टीम इंडियाला बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 9 विकेट्सने विजय मिळवला.

| Updated on: Mar 03, 2023 | 5:40 PM
Share
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटीत 9 विकेट्सने  दणदणीत विजय मिळवला. टीम इंडिया हा सामना जिंकून विजयाची हॅट्रिक पूर्ण करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना या कसोटीआधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत केलं. त्यामुळे मालिकेत 3 सामन्यांनंतर 2-1 अशी स्थिती झाली आहे. टीम इंडियाच्या नावावर या पराभवासह काही वाईट रेकॉर्डसची नोंद झाली आहे.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटीत 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. टीम इंडिया हा सामना जिंकून विजयाची हॅट्रिक पूर्ण करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना या कसोटीआधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत केलं. त्यामुळे मालिकेत 3 सामन्यांनंतर 2-1 अशी स्थिती झाली आहे. टीम इंडियाच्या नावावर या पराभवासह काही वाईट रेकॉर्डसची नोंद झाली आहे.

1 / 5
टीम इंडियाने या सामन्यात पहिले बॅटिंग केली आणि मॅच अडीच दिवसातच संपली. टीम इंडियाचा 2012-13 नंतर पहिल्यांदात आपल्या घरात पराभव झालाय. टीम इंडियाला होम सीरिजमध्ये याआधी 2012-13 मध्ये इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हा सामना कोलकातामधील इडन गार्डनमध्ये खेळवण्यात आला होता. टीम इंडियाने या सामन्यातही पहिले बॅटिंग केली होती.

टीम इंडियाने या सामन्यात पहिले बॅटिंग केली आणि मॅच अडीच दिवसातच संपली. टीम इंडियाचा 2012-13 नंतर पहिल्यांदात आपल्या घरात पराभव झालाय. टीम इंडियाला होम सीरिजमध्ये याआधी 2012-13 मध्ये इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हा सामना कोलकातामधील इडन गार्डनमध्ये खेळवण्यात आला होता. टीम इंडियाने या सामन्यातही पहिले बॅटिंग केली होती.

2 / 5
कोलकातातील हा सामना तिसऱ्याच दिवशी संपला होता. टीम इंडियाचा कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी पराभूत होण्याची ही सहावी वेळ आहे. इंदूरआधी टीम इंडियाला पुण्यात ऑस्ट्रेलियाने 2016-17 मध्ये पराभूक केलं होतं. त्याआधी दक्षिण आफ्रिकेने 2007-08 मध्ये अहमदाबाद, 2000-01 मुंबई,  1999-200० दक्षिण आफ्रिका आणि 1951-52 साली कानपूरमध्ये इंग्लंडने टीम इंडियाला तिसऱ्याच दिवशी पराभवाची धूळ चारली होती.

कोलकातातील हा सामना तिसऱ्याच दिवशी संपला होता. टीम इंडियाचा कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी पराभूत होण्याची ही सहावी वेळ आहे. इंदूरआधी टीम इंडियाला पुण्यात ऑस्ट्रेलियाने 2016-17 मध्ये पराभूक केलं होतं. त्याआधी दक्षिण आफ्रिकेने 2007-08 मध्ये अहमदाबाद, 2000-01 मुंबई, 1999-200० दक्षिण आफ्रिका आणि 1951-52 साली कानपूरमध्ये इंग्लंडने टीम इंडियाला तिसऱ्याच दिवशी पराभवाची धूळ चारली होती.

3 / 5
इंदूरमधील कसोटी भारतातील बॉल काउंटनुसार सर्वात लहान मॅच ठरली. या सामन्याचा निकाल अवघ्या 1 हजार 135 बॉलनंतर लागला.  याआधी  1983-84 मध्ये भारत-विंडिज यांच्यातील सामना हा 1 हजार 474 बॉलमध्येच संपला होता.

इंदूरमधील कसोटी भारतातील बॉल काउंटनुसार सर्वात लहान मॅच ठरली. या सामन्याचा निकाल अवघ्या 1 हजार 135 बॉलनंतर लागला. याआधी 1983-84 मध्ये भारत-विंडिज यांच्यातील सामना हा 1 हजार 474 बॉलमध्येच संपला होता.

4 / 5
दरम्यान आता ऑस्ट्रेलियाचं लक्ष हे अहमदाबादमधील चौथ्या कसोटीवर आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर मालिका 2-2 ने बरोबरीत सुटेल.  सामना ड्रॉ राहिल्यास टीम इंडिया ही मालिका 2-1 अशा फरकाने सीरिज जिंकेल

दरम्यान आता ऑस्ट्रेलियाचं लक्ष हे अहमदाबादमधील चौथ्या कसोटीवर आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर मालिका 2-2 ने बरोबरीत सुटेल. सामना ड्रॉ राहिल्यास टीम इंडिया ही मालिका 2-1 अशा फरकाने सीरिज जिंकेल

5 / 5
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार.
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ.
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.