AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDvsAUS : टीम इंडियाचा पराभव आणि ‘खेळ खल्लास’, इंदूरमध्ये मोठा उलटफेर

टीम इंडियाला बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 9 विकेट्सने विजय मिळवला.

| Updated on: Mar 03, 2023 | 5:40 PM
Share
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटीत 9 विकेट्सने  दणदणीत विजय मिळवला. टीम इंडिया हा सामना जिंकून विजयाची हॅट्रिक पूर्ण करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना या कसोटीआधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत केलं. त्यामुळे मालिकेत 3 सामन्यांनंतर 2-1 अशी स्थिती झाली आहे. टीम इंडियाच्या नावावर या पराभवासह काही वाईट रेकॉर्डसची नोंद झाली आहे.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटीत 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. टीम इंडिया हा सामना जिंकून विजयाची हॅट्रिक पूर्ण करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना या कसोटीआधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत केलं. त्यामुळे मालिकेत 3 सामन्यांनंतर 2-1 अशी स्थिती झाली आहे. टीम इंडियाच्या नावावर या पराभवासह काही वाईट रेकॉर्डसची नोंद झाली आहे.

1 / 5
टीम इंडियाने या सामन्यात पहिले बॅटिंग केली आणि मॅच अडीच दिवसातच संपली. टीम इंडियाचा 2012-13 नंतर पहिल्यांदात आपल्या घरात पराभव झालाय. टीम इंडियाला होम सीरिजमध्ये याआधी 2012-13 मध्ये इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हा सामना कोलकातामधील इडन गार्डनमध्ये खेळवण्यात आला होता. टीम इंडियाने या सामन्यातही पहिले बॅटिंग केली होती.

टीम इंडियाने या सामन्यात पहिले बॅटिंग केली आणि मॅच अडीच दिवसातच संपली. टीम इंडियाचा 2012-13 नंतर पहिल्यांदात आपल्या घरात पराभव झालाय. टीम इंडियाला होम सीरिजमध्ये याआधी 2012-13 मध्ये इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हा सामना कोलकातामधील इडन गार्डनमध्ये खेळवण्यात आला होता. टीम इंडियाने या सामन्यातही पहिले बॅटिंग केली होती.

2 / 5
कोलकातातील हा सामना तिसऱ्याच दिवशी संपला होता. टीम इंडियाचा कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी पराभूत होण्याची ही सहावी वेळ आहे. इंदूरआधी टीम इंडियाला पुण्यात ऑस्ट्रेलियाने 2016-17 मध्ये पराभूक केलं होतं. त्याआधी दक्षिण आफ्रिकेने 2007-08 मध्ये अहमदाबाद, 2000-01 मुंबई,  1999-200० दक्षिण आफ्रिका आणि 1951-52 साली कानपूरमध्ये इंग्लंडने टीम इंडियाला तिसऱ्याच दिवशी पराभवाची धूळ चारली होती.

कोलकातातील हा सामना तिसऱ्याच दिवशी संपला होता. टीम इंडियाचा कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी पराभूत होण्याची ही सहावी वेळ आहे. इंदूरआधी टीम इंडियाला पुण्यात ऑस्ट्रेलियाने 2016-17 मध्ये पराभूक केलं होतं. त्याआधी दक्षिण आफ्रिकेने 2007-08 मध्ये अहमदाबाद, 2000-01 मुंबई, 1999-200० दक्षिण आफ्रिका आणि 1951-52 साली कानपूरमध्ये इंग्लंडने टीम इंडियाला तिसऱ्याच दिवशी पराभवाची धूळ चारली होती.

3 / 5
इंदूरमधील कसोटी भारतातील बॉल काउंटनुसार सर्वात लहान मॅच ठरली. या सामन्याचा निकाल अवघ्या 1 हजार 135 बॉलनंतर लागला.  याआधी  1983-84 मध्ये भारत-विंडिज यांच्यातील सामना हा 1 हजार 474 बॉलमध्येच संपला होता.

इंदूरमधील कसोटी भारतातील बॉल काउंटनुसार सर्वात लहान मॅच ठरली. या सामन्याचा निकाल अवघ्या 1 हजार 135 बॉलनंतर लागला. याआधी 1983-84 मध्ये भारत-विंडिज यांच्यातील सामना हा 1 हजार 474 बॉलमध्येच संपला होता.

4 / 5
दरम्यान आता ऑस्ट्रेलियाचं लक्ष हे अहमदाबादमधील चौथ्या कसोटीवर आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर मालिका 2-2 ने बरोबरीत सुटेल.  सामना ड्रॉ राहिल्यास टीम इंडिया ही मालिका 2-1 अशा फरकाने सीरिज जिंकेल

दरम्यान आता ऑस्ट्रेलियाचं लक्ष हे अहमदाबादमधील चौथ्या कसोटीवर आहे. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर मालिका 2-2 ने बरोबरीत सुटेल. सामना ड्रॉ राहिल्यास टीम इंडिया ही मालिका 2-1 अशा फरकाने सीरिज जिंकेल

5 / 5
Follow Us
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...