AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1..2..3..! आशिया कप स्पर्धेच्या भारत युएई सामन्यात नोंदवले गेले तीन विक्रम, वाचा काय ते

आशिया कप 2025 स्पर्धेची सुरुवात भारताने दमदार केली. दुबळ्या युएई संघाला अक्षरश: चिरडलं. हा सामना पूर्णपणे एकतर्फी होता. या सामन्यात युएईने प्रथम फलंदाजी करताना 57 धावा केल्या आणि विजयासाठी 58 धावा दिल्या. हे आव्हान टीम इंडियाने एक गडी गमवून 4.3 षटकात पूर्ण केलं.

| Updated on: Sep 10, 2025 | 10:53 PM
Share
आशिया कप स्पर्धेची सुरुवात भारतीय संघाने विजयाने केली. भारताने युएईचा 9 गडी राखून पराभव केला. या सामन्यात नाणेफेक गमावल्याने युएईने प्रथम फलंदाजी केली. 13.1 षटकं खेळत युएईने 57 धावा केल्या आणि विजयासाठी 58 धावांचं आव्हान दिलं. (Photo - BCCI Twitter)

आशिया कप स्पर्धेची सुरुवात भारतीय संघाने विजयाने केली. भारताने युएईचा 9 गडी राखून पराभव केला. या सामन्यात नाणेफेक गमावल्याने युएईने प्रथम फलंदाजी केली. 13.1 षटकं खेळत युएईने 57 धावा केल्या आणि विजयासाठी 58 धावांचं आव्हान दिलं. (Photo - BCCI Twitter)

1 / 5
युएईने दिलेलं 58 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी भारतीय संघाला फार काही वेळ लागला नाही. 4.3 षटकात एक विकेट गमवून ही धावसंख्या गाठली. या विजयासह या सामन्यात तीन विक्रम नोंदवले गेले. या विक्रमांची आता क्रीडा वर्तुळात चर्चा होत आहे.  (Photo - BCCI Twitter)

युएईने दिलेलं 58 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी भारतीय संघाला फार काही वेळ लागला नाही. 4.3 षटकात एक विकेट गमवून ही धावसंख्या गाठली. या विजयासह या सामन्यात तीन विक्रम नोंदवले गेले. या विक्रमांची आता क्रीडा वर्तुळात चर्चा होत आहे. (Photo - BCCI Twitter)

2 / 5
आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक चेंडू राखून भारतीय संघाने विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात 93 चेंडू शिल्लक ठेवले. यापूर्वी भारताचा 81 राखून विजय मिळवण्याचा विक्रम स्कॉटलँडविरुद्ध 2021 मध्ये होता.  जागतिक पातळीवर अशी कामगिरी करणारा भारत हा दुसरा संघ आहे. यापूर्वी इंग्लंडने ओमान विरुद्ध 2024 मध्ये 101 चेंडू राखून विजय मिळवला होता. श्रीलंकेने 2014 मध्ये नेदरलँडविरुद्ध 90, झिम्बाब्वेने मोझाम्बूक्यू नैरोबीविरुद्द 90 चेंडू राखून विजय मिळवला होता.  (Photo - BCCI Twitter)

आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक चेंडू राखून भारतीय संघाने विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात 93 चेंडू शिल्लक ठेवले. यापूर्वी भारताचा 81 राखून विजय मिळवण्याचा विक्रम स्कॉटलँडविरुद्ध 2021 मध्ये होता. जागतिक पातळीवर अशी कामगिरी करणारा भारत हा दुसरा संघ आहे. यापूर्वी इंग्लंडने ओमान विरुद्ध 2024 मध्ये 101 चेंडू राखून विजय मिळवला होता. श्रीलंकेने 2014 मध्ये नेदरलँडविरुद्ध 90, झिम्बाब्वेने मोझाम्बूक्यू नैरोबीविरुद्द 90 चेंडू राखून विजय मिळवला होता. (Photo - BCCI Twitter)

3 / 5
टी20 सामना कमी चेंडूत संपण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी श्रीलंका नेदरलँड यांच्यात 2014 साली झालेला सामना 93 चेंडूत संपला होता. त्यानंतर ओमान इंग्लंड सामना 2024 मध्ये 99 चेंडूत संपलेला. नेदरलँड श्रीलंका सामना 2021 मध्ये 103 चेंडूत संपला होता. आता भारत युएई सामना 106 चेंडूत संपला आहे.  (Photo - BCCI Twitter)

टी20 सामना कमी चेंडूत संपण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी श्रीलंका नेदरलँड यांच्यात 2014 साली झालेला सामना 93 चेंडूत संपला होता. त्यानंतर ओमान इंग्लंड सामना 2024 मध्ये 99 चेंडूत संपलेला. नेदरलँड श्रीलंका सामना 2021 मध्ये 103 चेंडूत संपला होता. आता भारत युएई सामना 106 चेंडूत संपला आहे. (Photo - BCCI Twitter)

4 / 5
युएईविरुद्धच्या सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. अशी कामगिरी करणारा टी20 क्रिकेटमध्ये भारताचा चौथा फलंदाज आहे. रोहित शर्माने आदिल राशीद विरुद्ध 2021 मध्ये, यशस्वी जयस्वालने सिकंदर रझा विरुद्ध 2024 मध्ये, संजू सॅमसनने जोफ्रा आर्चरविरुद्ध 2025 मध्ये आणि अभिषेक शर्माने हैदर अली विरुद्ध अशी कामगिरी केली.  (Photo - BCCI Twitter)

युएईविरुद्धच्या सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. अशी कामगिरी करणारा टी20 क्रिकेटमध्ये भारताचा चौथा फलंदाज आहे. रोहित शर्माने आदिल राशीद विरुद्ध 2021 मध्ये, यशस्वी जयस्वालने सिकंदर रझा विरुद्ध 2024 मध्ये, संजू सॅमसनने जोफ्रा आर्चरविरुद्ध 2025 मध्ये आणि अभिषेक शर्माने हैदर अली विरुद्ध अशी कामगिरी केली. (Photo - BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.