AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2025 : वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वात आरसीबीच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद

वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी घोडदौड सुरु आहे. आरसीबीने दिल्लीला पराभूत करत या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सने दिलेलं 141 धावांचं लक्ष्य आरसीबीने 16.2 षटकात पूर्ण केलं. यासह आरसीबीने या स्पर्धेत एका विक्रमाची नोंद केली आहे.

| Updated on: Feb 18, 2025 | 6:04 PM
Share
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळा ऑलआऊट करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर होता.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळा ऑलआऊट करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर होता.

1 / 5
वडोदऱ्याच्या कोटाम्बी मैदानात आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना रंगला. आरसीबीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 19.3 षटकात सर्व गडी गमवून 141 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सला ऑलआऊट करताच आरसीबीच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.

वडोदऱ्याच्या कोटाम्बी मैदानात आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना रंगला. आरसीबीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 19.3 षटकात सर्व गडी गमवून 141 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सला ऑलआऊट करताच आरसीबीच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.

2 / 5
आरसीबीच्या आधी हा विक्रम मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्या नावावर होता. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या 20 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला तीन वेळा ऑलआऊट केलं आहे. तर यूपी वॉरियर्सने 18 सामन्यात तीन वेळा अशी कामगिरी केली आहे.

आरसीबीच्या आधी हा विक्रम मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्या नावावर होता. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या 20 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला तीन वेळा ऑलआऊट केलं आहे. तर यूपी वॉरियर्सने 18 सामन्यात तीन वेळा अशी कामगिरी केली आहे.

3 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या दोन्ही संघांना मागे टाकले आहे. आरसीबीने 20 सामन्यात 4 वेळा प्रतिस्पर्धी संघाला ऑलआऊट करून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या दोन्ही संघांना मागे टाकले आहे. आरसीबीने 20 सामन्यात 4 वेळा प्रतिस्पर्धी संघाला ऑलआऊट करून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

4 / 5
दुसरीकडे, आरसीबीने 20 सामन्यापैकी 10 सामन्यात विजय मिळवला असून  यशस्वी संघांच्या यादीत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर विजयी मालिका सुरू ठेवली तर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (13 विजय) यांना मागे टाकून अव्वल स्थानावर पोहोचू शकेल.

दुसरीकडे, आरसीबीने 20 सामन्यापैकी 10 सामन्यात विजय मिळवला असून यशस्वी संघांच्या यादीत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर विजयी मालिका सुरू ठेवली तर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (13 विजय) यांना मागे टाकून अव्वल स्थानावर पोहोचू शकेल.

5 / 5
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...