AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : कोल्हापूरातील द्राक्ष महोत्सवाचा थेट ग्राहकांना लाभ, संकटावर मात करुन द्राक्षांचा गोडवा कायम

कोल्हापूर : द्राक्ष बागा बहरात असतानाच निसर्गाची अवकृपा झाली आणि एका मागून एक संकटे ही द्राक्ष उत्पादकांसमोर उभी ठाकली होती. अखेर संकटावर मात करुन द्राक्ष ही बाजारपेठेत दाखल झाली आहेत. शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने कोल्हापूर शहरामध्ये द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी-पणन विभाग कोल्हापूर आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव भरला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. गतवर्षी सुरु झालेल्या या महोत्सवात यंदाही सातत्य राहिलेले आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना एक ना अनेक जातींच्या द्राक्षांची खरेदी करता आली तर महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही अधिकचा दर मिळाला.

| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 5:38 PM
Share
वातावरणातील बदलामुळे आता खराब द्राक्षाचे बेदाण्याचे उत्पादन घेतले जाणार आहे.

वातावरणातील बदलामुळे आता खराब द्राक्षाचे बेदाण्याचे उत्पादन घेतले जाणार आहे.

1 / 5
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन यंदा द्राक्ष महोत्सवाचे दुसरे वर्ष होते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या महोत्सवात खूप मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून वेगवेगळ्या जातीचे द्राक्ष या ठिकाणी घेऊन शेतकरी आले आहेत...नागरिक देखील या महोत्सवात येऊन थेट शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करताना दिसत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन यंदा द्राक्ष महोत्सवाचे दुसरे वर्ष होते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या महोत्सवात खूप मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून वेगवेगळ्या जातीचे द्राक्ष या ठिकाणी घेऊन शेतकरी आले आहेत...नागरिक देखील या महोत्सवात येऊन थेट शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करताना दिसत आहेत.

2 / 5
योग्य दर मिळावा हीच अपेक्षा : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी अवस्था झाली आहे. आता किमान दर तरी चांगला मिळावा ही अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. अनेक संकटावर मात केल्यानंतर हे उत्पादन पदरी पडले आहे. त्याचे चीज व्हावे हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

योग्य दर मिळावा हीच अपेक्षा : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी अवस्था झाली आहे. आता किमान दर तरी चांगला मिळावा ही अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. अनेक संकटावर मात केल्यानंतर हे उत्पादन पदरी पडले आहे. त्याचे चीज व्हावे हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

3 / 5
सांगली द्राक्षाचे आगार नाशिक नंतर सांगलीमध्ये द्राक्षाचे क्षेत्र आणि उत्पादकताही आहे. शेतकऱ्यांचा माल ग्राहकापर्यंत पोहचण्यासाठी हा महोत्सव निमित्त ठरत आहे. त्यामुळे ग्राहक थेट शेतकऱ्यांच्या संपर्कात येत असल्याने दर्जेदार माल शेतकऱ्यांना मिळतो. या दोन्ही घटकांमधील दलाली कमी होते. शिवाय शेतकऱ्यांनाही चार पैसे मिळतात.

सांगली द्राक्षाचे आगार नाशिक नंतर सांगलीमध्ये द्राक्षाचे क्षेत्र आणि उत्पादकताही आहे. शेतकऱ्यांचा माल ग्राहकापर्यंत पोहचण्यासाठी हा महोत्सव निमित्त ठरत आहे. त्यामुळे ग्राहक थेट शेतकऱ्यांच्या संपर्कात येत असल्याने दर्जेदार माल शेतकऱ्यांना मिळतो. या दोन्ही घटकांमधील दलाली कमी होते. शिवाय शेतकऱ्यांनाही चार पैसे मिळतात.

4 / 5
द्राक्षांचे अनेक प्रकार: निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले असले तरी कोल्हापूरच्या या महोत्सवात वेगवेगळ्या जातीचे द्राक्ष दाखल झाले होते. वेगळेपण दाखवून देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला तर ग्राहकांनीही चांगला प्रतिसाद दिला होता. नागरिक शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करताना दिसत होते.

द्राक्षांचे अनेक प्रकार: निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले असले तरी कोल्हापूरच्या या महोत्सवात वेगवेगळ्या जातीचे द्राक्ष दाखल झाले होते. वेगळेपण दाखवून देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला तर ग्राहकांनीही चांगला प्रतिसाद दिला होता. नागरिक शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी करताना दिसत होते.

5 / 5
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.