AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसाने शेतीतील उभे पीक आडवे…निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांचे आश्रू पुसणार कोण?

राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसाचा फटका विदर्भ आणि मराठवाड्यात बसला आहे. या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट आले आहे. परंतु शेतकऱ्यांचे हे आश्रू पुसणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 11, 2024 | 2:59 PM
Share
नागपुरात एकीकडे राजकारणाचा पारा गरम झाला असताना पावसाने मात्र वातावरणात गारवा निर्माण केला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. विदर्भात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे.

नागपुरात एकीकडे राजकारणाचा पारा गरम झाला असताना पावसाने मात्र वातावरणात गारवा निर्माण केला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. विदर्भात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे.

1 / 5
अवकाळी पाऊस, गारपीटने विदर्भातील शेती शिवारात असणारे पीक उद्ध्वस्त झालंय. गारांच्या तडाख्याने टरबूज, डांगर तसचं इतर फळ, भाजीपाला, उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील डांगराचे पीक मातीमोल झालंय.शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेलाय.

अवकाळी पाऊस, गारपीटने विदर्भातील शेती शिवारात असणारे पीक उद्ध्वस्त झालंय. गारांच्या तडाख्याने टरबूज, डांगर तसचं इतर फळ, भाजीपाला, उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील डांगराचे पीक मातीमोल झालंय.शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेलाय.

2 / 5
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी येथील अल्पभूधारक शेतकरी हिम्मत खंडेराव शिंदे यांच्या 3 एकर ज्वारी पिकांचं वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं प्रचंड नुकसान झालं आहे. आचारसंहितेचा नियम बाजूला ठेवून जिल्हा प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी येथील अल्पभूधारक शेतकरी हिम्मत खंडेराव शिंदे यांच्या 3 एकर ज्वारी पिकांचं वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं प्रचंड नुकसान झालं आहे. आचारसंहितेचा नियम बाजूला ठेवून जिल्हा प्रशासनानं तात्काळ पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

3 / 5
अकोला जिल्हातील अकोट तालुक्यातील रूईखेड परिसरातील पणज, चोचरा, महागाव, मार्डी परिसरात अवकाळी पाऊस झाला. या वादळी वारा आणि गारपीटमुळे गहू, हरभरा, ज्वारी, आंबा, संत्रा पिकांसह केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

अकोला जिल्हातील अकोट तालुक्यातील रूईखेड परिसरातील पणज, चोचरा, महागाव, मार्डी परिसरात अवकाळी पाऊस झाला. या वादळी वारा आणि गारपीटमुळे गहू, हरभरा, ज्वारी, आंबा, संत्रा पिकांसह केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

4 / 5
लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाचा फळबागांना फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने उभी असलेली ज्वारी पिके आडवी पडली आहेत. लातूरमध्ये अजूनही ढगाळ वातावरण असून वातावरणातील गारठा काही प्रमाणात कमी झाला आहे. ४२ अंशावर गेलेले तापमान आता खाली आले आहे.

लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाचा फळबागांना फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने उभी असलेली ज्वारी पिके आडवी पडली आहेत. लातूरमध्ये अजूनही ढगाळ वातावरण असून वातावरणातील गारठा काही प्रमाणात कमी झाला आहे. ४२ अंशावर गेलेले तापमान आता खाली आले आहे.

5 / 5
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा