AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवणानंतर पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती? 99 टक्के लोकांना कल्पनाच नाही

वेगवान जीवनात अनेकदा आपण अन्न पचनकडे दुर्लक्ष करतो. आयुर्वेदानुसार, जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. ते पचनक्रिया मंदावते. ४०-४५ मिनिटांनी पाणी प्यावे. हळूहळू आणि चावून खाणे, तसेच ताजे पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. रात्री हलके जेवा आणि तणावापासून दूर राहा

| Updated on: Aug 20, 2025 | 3:45 PM
Share
आजच्या वेगवान युगात अनेकदा लोक निरोगी आहाराकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. यानंतर कालांतराने गंभीर आजार उद्भवू शकतात. धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोकांकडे वेळ नसतो.

आजच्या वेगवान युगात अनेकदा लोक निरोगी आहाराकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. यानंतर कालांतराने गंभीर आजार उद्भवू शकतात. धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोकांकडे वेळ नसतो.

1 / 8
भूक लागल्यावर काहीतरी खाणे, आपण काय खात आहोत आणि त्याचे फायदे काय आहेत, याकडे अनेक जण फारसे लक्ष देत नाही. काहीही खाल्ल्यानंतर आपण लगेचच पाणी पितो. पण जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास काय होते आणि पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

भूक लागल्यावर काहीतरी खाणे, आपण काय खात आहोत आणि त्याचे फायदे काय आहेत, याकडे अनेक जण फारसे लक्ष देत नाही. काहीही खाल्ल्यानंतर आपण लगेचच पाणी पितो. पण जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास काय होते आणि पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

2 / 8
आयुर्वेद आणि इतर नैसर्गिक उपचार पद्धतींमध्ये जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनक्रिया मंदावते. जेवण पचवण्यासाठी शरीरातील पाचक रस आणि अग्नी सक्रिय होतात.

आयुर्वेद आणि इतर नैसर्गिक उपचार पद्धतींमध्ये जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनक्रिया मंदावते. जेवण पचवण्यासाठी शरीरातील पाचक रस आणि अग्नी सक्रिय होतात.

3 / 8
लगेच पाणी प्यायल्यास हे पाचक रस पातळ होतात. ज्यामुळे अन्न नीट पचत नाही. यामुळे गॅस, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जेवणानंतर लगेच पाणी पिण्याऐवजी ४० ते ४५ मिनिटांनी पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

लगेच पाणी प्यायल्यास हे पाचक रस पातळ होतात. ज्यामुळे अन्न नीट पचत नाही. यामुळे गॅस, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जेवणानंतर लगेच पाणी पिण्याऐवजी ४० ते ४५ मिनिटांनी पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

4 / 8
या वेळेत पचनक्रिया सुरळीत होते. तसेच शरीराला आवश्यक पोषणतत्त्वे शोषून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. तुम्हाला तहान लागली असल्यास जेवणाच्या दरम्यान एक-दोन घोट पाणी पिऊ शकता. परंतु, जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळा.

या वेळेत पचनक्रिया सुरळीत होते. तसेच शरीराला आवश्यक पोषणतत्त्वे शोषून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. तुम्हाला तहान लागली असल्यास जेवणाच्या दरम्यान एक-दोन घोट पाणी पिऊ शकता. परंतु, जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळा.

5 / 8
जेवताना शांत आणि आनंदी वातावरण ठेवा. राग, भीती किंवा ताण यांसारख्या नकारात्मक भावना पचनक्रियेवर वाईट परिणाम करतात. अन्न हळूहळू आणि चावून खाल्ल्याने पचन चांगले होते. यामुळे पाचक एन्झाइम्स सक्रिय होतात. तसेच पोटाच्या समस्या टाळता येतात.

जेवताना शांत आणि आनंदी वातावरण ठेवा. राग, भीती किंवा ताण यांसारख्या नकारात्मक भावना पचनक्रियेवर वाईट परिणाम करतात. अन्न हळूहळू आणि चावून खाल्ल्याने पचन चांगले होते. यामुळे पाचक एन्झाइम्स सक्रिय होतात. तसेच पोटाच्या समस्या टाळता येतात.

6 / 8
आयुर्वेदानुसार, ताजे आणि हंगामात उपलब्ध असणारे पदार्थ खाण्यावर भर द्या. रात्री हलके जेवा आणि लवकर जेवा, जेणेकरून झोपण्यापूर्वी पचनासाठी पुरेसा वेळ मिळेल. जास्त तेलकट किंवा जड पदार्थ खाऊ नका. यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो, ज्यामुळे गॅस आणि ऍसिडिटी होऊ शकते. दुपारी भरपेट जेवा आणि रात्री हलके जेवा.

आयुर्वेदानुसार, ताजे आणि हंगामात उपलब्ध असणारे पदार्थ खाण्यावर भर द्या. रात्री हलके जेवा आणि लवकर जेवा, जेणेकरून झोपण्यापूर्वी पचनासाठी पुरेसा वेळ मिळेल. जास्त तेलकट किंवा जड पदार्थ खाऊ नका. यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो, ज्यामुळे गॅस आणि ऍसिडिटी होऊ शकते. दुपारी भरपेट जेवा आणि रात्री हलके जेवा.

7 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा