AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वायफाय राऊटर नक्की कधी आणि किती वेळा रीस्टार्ट करावा?

तुमच्या घरातील वाय-फाय राउटर २४ तास चालू असतो का? यामुळे इंटरनेट स्पीड कमी होऊ शकतो. राउटर कधी, कसा आणि किती वेळा रीस्टार्ट करावा आणि त्याचे फायदे काय आहेत, याबद्दल सविस्तर माहिती वाचा.

| Updated on: Jun 08, 2026 | 2:16 PM
Share
आपल्या घरात अशी अनेक उपकरणं असतात जी एकदा सुरू झाली की अनेक दिवस किंवा महिने चालूच असतात. यात वाय-फाय राउटर (Wi-Fi Router) चाही समावेश होतो. अनेकदा आपल्या घरातील वायफाय राऊटर आपण २४ तास चालूच ठेवतो.

आपल्या घरात अशी अनेक उपकरणं असतात जी एकदा सुरू झाली की अनेक दिवस किंवा महिने चालूच असतात. यात वाय-फाय राउटर (Wi-Fi Router) चाही समावेश होतो. अनेकदा आपल्या घरातील वायफाय राऊटर आपण २४ तास चालूच ठेवतो.

1 / 6
पण तुम्हाला माहीत आहे का? या सवयीमुळेच तुमच्या इंटरनेटचा स्पीड अचानक कमी होतो किंवा वाय-फाय कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या निर्माण होतात. अशा वेळी फक्त राऊटर रीस्टार्ट केल्याने इंटरनेटच्या बहुतांश समस्या एका झटक्यात सुटू शकतात. पण राउटर नक्की कधी, कसा आणि किती वेळा रीस्टार्ट करावा? याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

पण तुम्हाला माहीत आहे का? या सवयीमुळेच तुमच्या इंटरनेटचा स्पीड अचानक कमी होतो किंवा वाय-फाय कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या निर्माण होतात. अशा वेळी फक्त राऊटर रीस्टार्ट केल्याने इंटरनेटच्या बहुतांश समस्या एका झटक्यात सुटू शकतात. पण राउटर नक्की कधी, कसा आणि किती वेळा रीस्टार्ट करावा? याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

2 / 6
राउटर सतत चालू राहिल्याने त्यामध्ये कॅशे मेमरी (Cache Memory) आणि जंक डेटा साठत राहतो. रीस्टार्ट केल्याने हा डेटा पूर्णपणे साफ होतो आणि राउटरची कार्यक्षमता वाढते. तसेच बॅकग्राउंडला सुरू असणाऱ्या अनावश्यक प्रोसेस बंद झाल्यामुळे इंटरनेटचा वेग आणि नेटवर्कमधील अडथळे दूर होतात.

राउटर सतत चालू राहिल्याने त्यामध्ये कॅशे मेमरी (Cache Memory) आणि जंक डेटा साठत राहतो. रीस्टार्ट केल्याने हा डेटा पूर्णपणे साफ होतो आणि राउटरची कार्यक्षमता वाढते. तसेच बॅकग्राउंडला सुरू असणाऱ्या अनावश्यक प्रोसेस बंद झाल्यामुळे इंटरनेटचा वेग आणि नेटवर्कमधील अडथळे दूर होतात.

3 / 6
जर तुमचे मोबाईल किंवा लॅपटॉप वाय-फायवरून वारंवार डिस्कनेक्ट होत असतील, तर रीस्टार्ट केल्याने कनेक्शन एकदम स्थिर होते. राउटर पुन्हा सुरू केल्यावर त्याला एक नवीन आणि फ्रेश आयपी ॲड्रेस (IP Address) मिळतो. यामुळे इंटरनेटचा स्पीड तर वाढतोच, शिवाय सुरक्षितताही सुधारते.

जर तुमचे मोबाईल किंवा लॅपटॉप वाय-फायवरून वारंवार डिस्कनेक्ट होत असतील, तर रीस्टार्ट केल्याने कनेक्शन एकदम स्थिर होते. राउटर पुन्हा सुरू केल्यावर त्याला एक नवीन आणि फ्रेश आयपी ॲड्रेस (IP Address) मिळतो. यामुळे इंटरनेटचा स्पीड तर वाढतोच, शिवाय सुरक्षितताही सुधारते.

4 / 6
राऊटर सतत चालू राहिल्याने तो गरम होतो. काही वेळ तो बंद ठेवल्यास अतिउष्णतेमुळे होणारे नुकसान टाळता येते. राउटर हा एका छोट्या कॉम्प्युटरसारखाच असतो, ज्याला स्वतःची मेमरी आणि ऑपरेटिंग सिस्टम असते.

राऊटर सतत चालू राहिल्याने तो गरम होतो. काही वेळ तो बंद ठेवल्यास अतिउष्णतेमुळे होणारे नुकसान टाळता येते. राउटर हा एका छोट्या कॉम्प्युटरसारखाच असतो, ज्याला स्वतःची मेमरी आणि ऑपरेटिंग सिस्टम असते.

5 / 6
त्यामुळे लोड कमी करण्यासाठी महिन्यातून किमान एकदा होम राउटर रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. यामुळे राउटरला एक नवीन सुरुवात मिळते. तसेच इंटरनेटचा वेग कायम राहतो.

त्यामुळे लोड कमी करण्यासाठी महिन्यातून किमान एकदा होम राउटर रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. यामुळे राउटरला एक नवीन सुरुवात मिळते. तसेच इंटरनेटचा वेग कायम राहतो.

6 / 6
Follow Us
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत