AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुषमा स्वराज यांना किडनीदानाच्या इच्छेमुळे टीका झालेला मुस्लिम तरुण म्हणतो…

सुषमा स्वराज यांची किडनी तीन वर्षांपूर्वी निकामी झाली होती. त्यावेळी मुजिब अन्सारीसह अनेक जणांनी किडनीदानाची इच्छा व्यक्त केली होती.

सुषमा स्वराज यांना किडनीदानाच्या इच्छेमुळे टीका झालेला मुस्लिम तरुण म्हणतो...
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं मंगळवारी (6 ऑगस्ट) निधन झालं.
| Edited By: | Updated on: Aug 07, 2019 | 10:48 AM
Share

मुंबई : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्या निधनानंतर विविध पक्षातील राजकीय नेते, कलाकार, क्रीडापटू यांच्यापासून सर्वसामान्य जनताही हळहळली. सुषमा स्वराज यांच्या भेटीत घडलेले किस्से आणि आठवणी अनेक जणांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. सुषमा स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होण्यापूर्वी त्यांना किडनीदानाची इच्छा एका मुस्लिम तरुणाने व्यक्त केली होती. तो मुजिब अन्सारी (Mujib Ansari) ही सुषमा यांच्या निधनाने हळहळला.

‘तीन वर्षांपूर्वी मी माझी किडनी सुषमा स्वराज यांना देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर मुस्लिम समाजातील अनेकांनी मला ट्रोल केलं. मात्र सुषमा मॅमसारख्या व्यक्ती धर्म, जात यांच्या पल्याड आहेत. मला त्यांच्यासाठी खूप दुःख होत आहे.’ अशा भावना मुजिबने ट्विटरवरुन व्यक्त केल्या आहेत.

सुषमा स्वराज यांची किडनी तीन वर्षांपूर्वी निकामी झाली होती. त्यावेळी अनेक जणांनी किडनीदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर ‘बंधूंनो, खूप खूप आभार. किडनीला धार्मिक बंधन नसतं.’ असं ट्वीट सुषमा यांनी केलं होतं. मुस्लिम तरुणांनी किडनीदानाची इच्छा व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर सुषमा यांनी भावना बोलून दाखवल्या होत्या.

मुजिब काय म्हणाला होता?

‘सुषमा स्वराज मॅम, मी बसप समर्थक आणि मुस्लिम आहे. पण मला तुम्हाला किडनीदान करण्याची इच्छा आहे. तुम्ही माझ्यासाठी मातेसमान आहात. अल्ला तुम्हाला आशीर्वाद देओ’ असं मुजिबने ट्वीट केलं होतं.

सुषमा स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना नवसंजीवनी लाभली होती. पुन्हा एकदा त्या धडाडीने देशाचा आवाज जगासमोर मांडत होत्या.

सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री निधन दिल्लीतील एम्समध्ये निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छातीत अचानकपणे दुखू लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्वराज यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण त्यांची झुंज अपयशी ठरली.

सुषमा स्वराज या प्रभावी वक्त्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. त्यांना सर्वपक्षीयांकडून मान-सन्मान मिळाला. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारतीय अडकले असतील, तर त्यांना सुषमा तातडीने मदत करत असत.

सुषमा स्वराज (14 फेब्रुवारी 1952 ते 6 ऑगस्ट 2019) यांची संपूर्ण कारकीर्द

2014 ते 2019 – परराष्ट्र मंत्री

मे 2014 ते जानेवारी 2016 – प्रवासी भारतीय कार्यमंत्री

2009 ते 2014 – लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या

जानेवारी 2003 ते मे 2004 – संसदीय कामकाज मंत्री

जानेवारी 2003 ते मे 2004 – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 – माहिती व प्रसारण मंत्री

ऑक्टोबर 1998 ते डिसेंबर 1998 – दिल्लीच्या मुख्यमंत्री

मे 2009 ते मे 2019 – खासदार (विदिशा लोकसभा मतदारसंघ)

मे 1996 ते ऑक्टोबर 1999 – खासदार (दक्षिण दिल्ली)

संबंधित बातम्या :

रात्री 8.50 वा. फोन झाला, सुषमा स्वराज यांनी उद्या 1 रुपये फी घेण्यासाठी बोलावलं होतं, हरीश साळवेंना धक्का

सुषमाजी, तुम्हाला देश कधीही विसरणार नाही : नरेंद्र मोदी

विद्यार्थी नेत्या ते देशाच्या परराष्ट्र मंत्री, सुषमा स्वराज यांची धगधगती कारकीर्द

Sushma Swaraj | सुषमा स्वराज यांची पाच कामं, देश कधीही विसरणार नाही!

57 मुस्लिम देशांसमोर सुषमा बरसल्या होत्या, भारत गांधींचा देश, इथे प्रत्येक प्रार्थना शांतीनेच संपते!

Sushma Swaraj : सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

‘तुमचीही आठवण येईल’ म्हणणाऱ्या ट्रोलरला जेव्हा सुषमा स्वराज यांनी दिलेलं शांतपणे उत्तर!

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.