AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत इशान किशनची होणार एन्ट्री? जाणून घ्या पाच कारणं

भारत आणि इंग्लंड पाचवा कसोटी सामना 31 जुलैपासून सुरु होणार आहे. या सामन्यात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत खेळणार नसल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. का ते जाणून घ्या.

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत इशान किशनची होणार एन्ट्री? जाणून घ्या पाच कारणं
IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत इशान किशनची होणार एन्ट्री? जाणून घ्या पाच कारणंImage Credit source: Harry Trump/Getty Images
| Updated on: Jul 24, 2025 | 4:55 PM
Share

चौथ्या कसोटीच्या पहिल्याच डावात भारताला मोठा धक्का बसला आहे. ऋषभ पंतच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली असून फ्रॅक्चर आहे. त्यामुळे पुढचे सहा आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे ऋषभ पंत पाचव्या कसोटी खेळणार नसल्याचं जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे त्याच्या जागी योग्य खेळाडूची निवड करण्यासाठी निवडकर्त्यांची धावपळ सुरु झाली आहे. ऋषभ पंतसाठी इशान किशन योग्य रिप्लेसमेंट ठरू शकते, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. दुसरीकडे, इशान किशनच्या टीम इंडियातील पुनरागमनासाठी पायघड्या घातल्या जात असल्याची चर्चा आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडू मिळालेल्या माहितीनुसार इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिलं आहे की, भारतीय निवडकर्ते पाचव्या कसोटीसाठी इशान किशनला बोलवू शकतात. जर असं झालं तर दोन वर्षांनी टीम इंडियात खेळणार आहे. इशान किशन शेवटचा कसोटी सामना जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. तर शेवटचा टी20 सामना नोव्हेंबर 2023 मध्ये खेळला होता.

ऋषभ पंतच्या जागी इशान किशनच का? तर त्यामागे पाच कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे तो विकेटकीपर आहे. दुसर कारण, इशान किशन ऋषभ पंतसारखा आक्रमक खेळतो. तिसरं कारण ऋषभ पंत ज्या जागी फलंदाजी करतो त्या जागेवर इशान किशन आरामात खेळू शकतो. चौथं कारण इशान किशन काउंटी क्रिकेटमध्ये नॉर्थेम्प्टनशरसाठी खेळला असून चांगली फलंदाजी केली. त्याने 87 आणि 77 धावांची खेळी केली. पाचवं कारण म्हणजे काउंटी क्रिकेट आणि इंडिया अ साठी खेळला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या वातावरणाची चांगली जाण आहे.

रिपोर्टनुसार, अजीत आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीने इशान किशनशी संपर्क साधला आहे. त्यामुळे ओवलवर पाचव्या कसोटीसाठी संघाचा भाग ठरू शकतो. त्यामुळे पाचव्या कसोटीत इशान किशन मैदानात दिसला तर आश्चर्य वाटायला नको. जर असं झालं तर टीम इंडियाची दारं त्याला दोन वर्षानंतर खुली होणार आहेत. इशान किशनने चांगली फलंदाजी केली तर त्याचं संघातील स्थानही निश्चित होऊ शकतं. कारण ऋषभ पंत हा वारंवार काही ना काही कारणास्तव दुखापतग्रस्त होत असतो. त्यामुळे संघात त्याची चांगली रिप्लेसमेंट असणं आवश्यक आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.