AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Test Championship : इंग्लंड दौऱ्याआधी कपील देव यांचा विराट कोहलीला महत्त्वपूर्ण सल्ला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्याला 18 जूनपासून साऊथहॅम्प्टन येथे सुरुवात होणार आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) या दोन तुल्यबळ संघात हा सामना होणार आहे. (Kapil Dev Advide Virat kohli Before India Tour of England) 

World Test Championship :  इंग्लंड दौऱ्याआधी कपील देव यांचा विराट कोहलीला महत्त्वपूर्ण सल्ला
विराट कोहली आणि कपील देव
| Updated on: May 28, 2021 | 2:51 PM
Share

मुंबई : भारताचा इंग्लंड दौरा येत्या काहीच दिवसांत सुरु होतोय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्याला 18 जूनपासून साऊथहॅम्प्टन येथे सुरुवात होणार आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) या आयसीसीच्या (ICC) कसोटी क्रमवारीतील पहिल्या दोन संघात हा सामना होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाचे माजी कर्णधार दिग्गज खेळाडू कपील देव (Kapil dev) यांनी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. इंग्लंड दौऱ्यात विराटने आक्रमतेवर नियंत्रण ठेवण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला कपील देव यांनी दिला आहे. (Kapil Dev Advide Virat kohli Before India Tour of England)

काय म्हणाले कपील देव?

पाठीमागच्या जवळपास दीड वर्षांपासून विराटच्या बॅटमधून शतक आलेलं नाहीय. इंग्लंड दौऱ्यात त्याच्या बॅटमधून रन्स निघतील अशी अपेक्षा आहे. परंतु अशी कामगिरी करताना त्याला अति आक्रमकतेपासून दूर रहावं लागेल. तो आक्रमकता दाखवतो, तो त्याचा स्वभाव आहे. परंतु मला भीती आहे की त्याने जास्त आक्रमकता दाखवू नये. प्रत्येक सेशन पार पडल्यानंतर त्याने आपल्या आक्रमकतेविषयी स्वत:लाच विचारायला हवं. जास्त आक्रमकता दाखवण्याऐवजी त्याने विरोधी टीमला वर पूर्ण नियंत्रण कसं मिळवता येईल, हे पाहावं, असं कपील देव म्हणाले.

त्याला रन्स करावेच लागतील. परंतु अति आक्रमकता थोडीशी बाजूला ठेवावी लागेल. काही गोष्टी लगेच मिळतील अशी परिस्थितीत इंग्लंडच्या वातावरणात नाहीय. तिथे बॉलच्या टप्प्यावर, स्विंगवर नजर ठेवावी लागेल. आपण जर सीम आणि स्विंग खूप चांगला खेळलात तर बॅटमधून धावा काढायला आपल्याला कुणीही रोखू शकत नाही, असं कपील देव म्हणाले.

भारताचा इंग्लंड दौरा

भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या मुंबईत क्वारंन्टाईन आहे. 14 दिवसांपासून क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर 24 सदस्यीय भारतीय संघ 2 तारखेला इंग्लंडसाठी प्रयान करेल. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC 2021) अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिका भारताला इंग्लंड दौऱ्यात खेळायची आहे. त्याअगोदर मुंबईत भारतीय संघाचा जोरदार सराव सुरु आहे.

किवीविरुद्ध भारताचं मिशन 72 तास

क्रिकेटच्या सामन्यांची रणनीती ही शक्यतो मैदानावर सराव करताना आखली जाते. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत राहून न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक जाणून घेणार आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येईल.

(Kapil Dev Advide Virat kohli Before India Tour of England)

हे ही वाचा :

World Test Championship : ‘मॅन ऑफ दी टूर्नामेंट’चा दावेदार कोण? अश्विनसह या दोन खेळाडूंमध्ये चुरस

WTC फायनल मॅच ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर काय होणार ICC ची महत्त्वपूर्ण घोषणा

World Test Championship: न्यूझीलंडविरुद्ध द्रविडची बॅट आग ओकायची, राहुलचे शिष्य किवींना आस्मान दाखवणार?

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.