लोकशाही परंपरांत तरी सत्तेचा अमर्याद गैरवापर कोणी करू नये. पोलिसांचा व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर कोण करत आहे. हे देशाची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कितीही झुंडशाही, मनमानी केली तरी केंद्र सरकारचे पोलीस त्यांची बेकायदेशीर पद्धतीने सुटका करून आरोपींना पळवून लावतात. बग्गा यांना अटक करून पंजाबात नेऊ नये म्हणून भाजपशासित राज्यांनी पंजाब पोलिसांची अड़वणूक केली आहे. तसेच त्यांची बेकायदेशीर पद्वतीने सुटका करून पळवून लावले. यालाच अराजक किंवा हुकूमशाही म्हणतात. या प्रवृत्तीस बळ देणारे एक दिवस याच मातीत मिसळतील. तोपर्यंत देश अखंड राहील काय ? असा सवाल आजच्या सामनाच्या अग्रलेखात उपस्थित केला आहे.