सातारा : अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशात विरोध होत असून ती मागे घ्यावी असा दबाव केंद्र सरकारवर विरोधी पक्षांकडून वाढविण्यात येत आहे. तर तरूणांकडून ही या योजनेला प्रखरविरोध करण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी जाळपोळीचा प्रकार ही होत आहेत. तर चक्काजाम ही केला जात आहे. याच दरम्यान या योजनेवरून साताऱ्यातही आंदोलन करण्यात आले. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्राच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी सातारा पोलिसांनी (Satara Police) चोख बंदोबस्त ठेवला होता.