शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर; लाखो शेतकऱ्यांना फायदा
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्याची यादी जाहीर करण्यात आली असून, अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात सुमारे 2 लाख 33 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्याची यादी जाहीर करण्यात आली असून, अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात सुमारे 2 लाख 33 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यभरातील एकूण 1 कोटी 32 लाख 70 हजार 34 लाभार्थी शेतकरी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 70 टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून, उर्वरित शेतकऱ्यांनीही लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असून, या प्रक्रियेकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
