Headline | 4 PM | भारतीय लसी परदेशात पाठवण्याची गरज नव्हती: अजित पवार
Four Minute Twenty Four Headlines

Headline | 4 PM | भारतीय लसी परदेशात पाठवण्याची गरज नव्हती: अजित पवार

| Updated on: May 01, 2021 | 5:24 PM

भारतीय लसी परदेशात पाठवण्याची गरज नव्हती, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

पुणे: सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज कोरोना लसींची कमतरता जाणवली नसती, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी लसींचे डोस मागितले आहेत. मात्र, आतापर्यंत आपल्याला फक्त 3 लाख डोस मिळाले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच वेगाने लसीकरण करण्याचा मनसुबा राज्य सरकारला अंमलात आणता येणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले