रेवदंडा, अलिबाग : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सवाल केलाय. बंगले का पाडले, असा प्रश्न त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरेजी, अलिबागमधील बंगले का पाडले? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं. हे बंगले कुठे गायब केले? कोणत्या हातोडाने पाडले? त्या संदर्भात माझं विस्तृत स्टेटमेंट मी पोलिसांना दिलं आहे. त्याचे पुरावे दिले आहेत. मला विश्वास आहे की, येत्या काही आठवड्यात त्यांना पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल, असं सोमय्या म्हणाले आहेत.