मुंबईची लोकल रेल्वे सामान्य माणसांची लाईफलाईन आहे. सामन्यांना लोकल नसल्यामुळे खर्च आणि प्रवासाचा वेळ वाढला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी त्यासाठी पाठपुरावा केला. दोन डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल सुरू करावी. एक डोस घेतलेल्यांनाही परवानगी देता येऊ शकेल. परंतु कुठूनतरी सुरूवात व्हायला हवी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कराडमध्ये पाहणी केल्यानंतर आज ते सांगलीला रवाना झाले. त्यादरम्यान त्यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.