Anna Hazare : कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर… अण्णा हजारे यांच्याकडून वृक्षतोडीवर चिंता व्यक्त

Harshada Shinkar | Updated on: Dec 12, 2025 | 11:24 AM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वृक्षतोडीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कुंभमेळ्यासाठी येणारे साधू जंगलात राहतात, पण झाडे तोडली जात आहेत, ही विसंगती देशाचे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. समाजातील स्वार्थ वाढत असून, जनतेला मालक मानून त्यांचे अधिकार तुडवणे चुकीचे आहे. एक दिवस जनताच यावर आवाज उठवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वृक्षतोड आणि सामाजिक मूल्यांच्या घसरणीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहतात, आणि जंगल म्हणजे झाडेच असतात. पण आपण झाडे तोडत आहोत, ही विसंगती असून देशाचे दुर्दैव असल्याचे हजारे यांनी म्हटले. या संदर्भात बोलताना अण्णा हजारे यांनी आपली भावना व्यक्त केली की, त्यांना झाडाची एक फांदी तोडलेली दिसली तरी वेदना होतात. ते स्वतः झाडे लावतात, पण तोडत नाहीत. समाजात स्वार्थी लोकांची संख्या वाढत असून, समाज आणि देशासाठी बलिदान देण्याची तयारी कमी होत चालली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हजारे यांना विश्वास आहे की, त्यांच्यासारखे काही लोक समाजासाठी बलिदान देण्यासाठी पुढे येतील. सध्या लोकांमध्ये असलेला संताप बोलका नसला तरी, एक दिवस तो निश्चितपणे व्यक्त होईल. चले जाओ असे म्हणत जनता आपला राग व्यक्त करेल, कारण जनताच खरी मालक आहे आणि मंत्री, संत्री हे केवळ सेवक आहेत. मालकांचे अधिकार तुडवणे योग्य नाही, असे अण्णा हजारे यांनी ठामपणे सांगितले.

Published on: Dec 12, 2025 11:24 AM
Follow Us