भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खोतकर यांनी 8 हजार शेतक-यांची फसवणुक केली आहे. जालन्यातील साखर कारखाना बेनामी पध्दतीने ताब्यात घेतला असला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी अनिल परब यांच्यावर देखील कारवाई होणार असल्याचे सांगितले. किरीट सोमय्या यांनी आत्तापर्यंत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.