औरंगाबादेत उद्योजकांना धमकावण्याचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाहीये. सध्या एका उद्योजकाला आयकर विभागाचा धाक दाखवून 60 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. भामट्यांनी खंडणी मागताच उद्योजकाने थेट पोलिसांकडे धाव घेतली असून सुशांत दत्तात्रय गिरी असे तक्रारदार उद्योजकाचे नाव आहे. या घटनेमुळे औरंगाबादेतील उद्योजक जगतात एकच खळबळ उडाली आहे. (Arrest to 3 people in ransom of 60 lakh in Aurangabad)