नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी राज्यातील सत्तासंघर्षाबाबत आशावाद व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा आहेत, असं अरविंद सावंत म्हणालेत. शिंदेगटातील आमदारांनी 10 व्या शेड्युलचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे आमदार अपात्र व्हायलायच हवेत. कोर्टाचा निकाल न्यायच्या बाजूने लागावा एवढीच अपेक्षा आहे. आम्हाला वाटतं की सर्वोच्च न्यायालय आमच्या बाजूने निकाल देईल, असं सावंत म्हणालेत. उद्धव ठाकरेंनी नैतिकता म्हणून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र आम्ही न्यायाची अपेक्षा करतोय. निकाल हा न्यायाच्या बाजूने लागायला हवा, असं अरविंद सावंत म्हणालेत.