जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच
यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने या वारकरी दाम्पत्याला मिळाला आहे. कळंब तालुक्यातील गौरगाव येथील हे दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले असून, त्यांच्या हस्ते पार पडलेल्या महापूजेमुळे गावात आणि वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीत भक्तीचा महासागर उसळला असून, “जय हरी विठ्ठल… जय हरी विठ्ठल…” आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषाने संपूर्ण पंढरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले असून, यंदा विक्रमी गर्दीची नोंद होत आहे.
यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने या वारकरी दाम्पत्याला मिळाला आहे. कळंब तालुक्यातील गौरगाव येथील हे दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले असून, त्यांच्या हस्ते पार पडलेल्या महापूजेमुळे गावात आणि वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, पंढरपूरमध्ये अभूतपूर्व आणि विक्रमी गर्दी पाहायला मिळत आहे. वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात संपूर्ण पंढरी भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेली आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेचे आणि भाविकांच्या सोयीसुविधांचे विशेष नियोजन केले असून, लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरमध्ये भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे.
