पुणे : राज्य सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आयएमएचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी टीका केली आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने विचार न करता घेतलेला आहे. 1ली ते 9 वी मुलांचं लसीकरण अजूनही झालेलं नाही.
शाळेत मुलं नियम पाळत नाहीत. त्यामुळे इतर विकार असलेल्या मुलांना कोरोनाचा त्रास होऊ शकतो. त्यांच्यापासून जर घरातील सदस्यांना तसेच वयोवृद्ध व्यक्तींना त्रास झाला तर ते गंभीर होईल. त्यामुळे मुलांचं लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य नाही, असे भोंडवे म्हणाले.