आझादी का अमृत महोत्सवनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातयं. याविषयीची माहिती स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या त्यांच्या कार्यक्रमात दिली. 13 आॅगस्ट ते 15 आॅगस्ट दरम्यान हर घर तिरंगा ही मोहिम राबवली जाणार आहे. म्हणजे काय तर प्रत्येक घरावर तिरंगा हा लावला जाणार आहे. घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा’ चळवळ पुढे नेण्यात येणार आहे. आपल्या घरावर 13 आॅगस्ट ते 15 आॅगस्टला तिरंगा लावण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी केले आहे. विशेष म्हणजे 2 आॅगस्ट आणि आपल्या भारताच्या तिरंग्याचा देखील खास संबंध असल्याचे मोदींनी म्हटले आहे.