“यावेळची मन की बात खूप खास आहे. यामागचं कारण म्हणजे या वर्षीचं स्वातंत्र्यदिन. भारत हा स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करणार आहे. आपण सर्वजण अत्यंत अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार बनणार आहोत. देवाने हे आपल्याला खूप मोठं सौभाग्य दिलं आहे. तुम्हीसुद्धा विचार करा, जर आपण गुलामगिरीत जन्मलो असतो तर या दिवसाची कल्पना आपल्यासाठी कशी असती,” असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये केला. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. याविषयीची माहिती नरेंद्र मोदींनी या मन की बातमध्ये दिली.