Congress | काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय म्हणणाऱ्या पार्थ पवारांना काँग्रेसकडून प्रत्युत्तर, अजित पवारांचा उल्लेख करत म्हटले…
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार पार्थ पवार यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, “उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून कोणालाही थांबवता येत नाही. जशी वेळ येईल तशी सामोरे जावे लागेल. येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊ. पाठिंब्यासाठी कोणाला फोन करणार नाही, पण वाईट वाटतंय की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु झालाय.”
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार पार्थ पवार यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, “उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून कोणालाही थांबवता येत नाही. जशी वेळ येईल तशी सामोरे जावे लागेल. येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊ. पाठिंब्यासाठी कोणाला फोन करणार नाही, पण वाईट वाटतंय की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु झालाय.”
पार्थ पवार यांच्या या विधानावर काँग्रेसकडून जोरदार टीका झाली आहे. काँग्रेसने म्हटले की, धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर आत्ताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणे अतिशय चुकीचे आहे. तसेच, स्वतः वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर राजकीय सोय साधण्यासाठी शांत राहणाऱ्या पार्थ पवार यांनी काँग्रेसविषयी केलेले विधान निंदनीय असल्याचे काँग्रेसने नमूद केले आहे. पार्थ पवार यांच्याकडून काँग्रेसच्या या टीकेला कसा प्रतिसाद मिळतो, हे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल.
या वादामुळे पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण अधिक तापलेले आहे आणि आगामी राजकीय परिस्थितीवर या वादाचा मोठा परिणाम होऊ शकतो.
