Bhaskar Jadhav : दानवेंचा ‘कॅश बॉम्ब’ अन् विरोधकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा; कोणाचीही भीती नाही, एवढ्या नोटा आल्या कुठून?

| Updated on: Dec 09, 2025 | 12:33 PM

भास्कर जाधव यांनी सत्ताधारी पक्षाकडे असलेल्या मोठ्या रोख रकमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नोटाबंदीनंतरही एवढ्या नोटा कशा येतात, यावर त्यांनी पंतप्रधानांना विचारणा केली. सत्ताधारी आमदारांचा पैशांसोबतचा व्हिडिओ समोर आल्यानंतरही मुख्यमंत्र्यांकडून गुन्हेगारांना क्लीन चिट दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नैतिकतेचे अधःपतन झाल्याचे दळवींचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडे मोठ्या प्रमाणात दोन नंबरचा पैसा (काळा पैसा) कसा येतो, यावर भास्कर जाधव यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी थेट देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारत, नोटबंदीचा निर्णय आणि डिजिटल चलन वापरण्याच्या आवाहनानंतरही एवढी मोठी रोकड सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे कुठून येते, याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाने नोटबंदी करण्यात आली होती, मात्र आता प्रचंड प्रमाणात पैसा पुन्हा समोर येत असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

भास्कर जाधव यांच्या मते, हजार आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामागे काळा पैसा बाहेर काढण्याचे नाटक केले गेले आणि आता हा पैसा मोठ्या प्रमाणावर पुन्हा बाहेर येऊ लागला आहे, अशी काही लोकांना त्यावेळीच शंका होती, ती आता खरी ठरताना दिसत आहे. त्यांनी गुलाबराव पाटील यांनी नगरविकास खात्यामध्ये माल असल्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. तसेच, आमदार दानवे यांनी ट्वीट करत पोस्ट केलेल्या कॅश कांड घोटाळ्याकडेही लक्ष वेधले.

Published on: Dec 09, 2025 12:33 PM