मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून रात्री अडीच वाजता मुंबईत पोहचले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले होते दोघांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राष्ट्रपती निवडणुका नंतर पंतप्रधान यांनी डीनरचे आयोजन केले होते त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे दिल्लीहून मुंबईत परत्यावर आता मंत्री मंडळाचा विस्तार कधी होणार हे पाहणं महत्वाचं असेल. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्याच अनुशंगाने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार लवकर होण्याची शक्यता आहे.