नागपूर : धार्मिक आणि जातीवादी विचारांना खतपाणी टाकणाऱ्या लोकांना शाहू फुलेच्या धर्तीवर पुरोगामी लोकांनी धडा शिकवलेले आहे. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असे वक्तव्य केले असून महागाई आणि बेरोजगारीची चीड जनतेने या निवडणुकीतून भाजपला दाखवले असल्याचे त्यांनी सूचक इशारा ही दिला आहे. भाजप सरकार संपूर्ण व्यवस्थेत नापास झाली आहे. याचा संताप लोकांनी दाखवल्याची सुतोवात यांनी केला आहे .